लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेल्या परळी तालुक्यातील वैद्यनाथ साखर कारखान्यचे पुनर्जीवन झाले. हा कारखाना ओंकार शुगर म्हणून नावा रुपाला आला मात्र शेतकऱ्यांच्या पदरी आज ही निराशाच पडतेय. शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे कारखान्याने दिलेच नाही म्हणून कारखाना परिसरात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. कारखान्याला टाळा ठोको सत्याग्रह आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी मागील चार महिन्यांपासूनच्या थकीत ऊस बिलासाठी आंदोलन केलं. ऊसतोड कामगारांचेही पैसे थकवल्याचंही या आंदोलकांनी सांगितलं.