Beed Man Ends Life: बीडमध्ये एका तरुणाने टोकाचं पाऊस उचलल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 29 वर्षीय वैभवच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुनील जाधव, बीड: शहरात एका तरूणाच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. बीड शहरातील खंडेश्वरी रोड परिसरातील साईनगर येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तरुणांमध्ये वाढत चाललेल्या मानसिक तणाव आणि व्यसनाधीनतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
राहत्या घरी गळफास
वैभव दीपक बुरांडे (वय 29, रा. साईनगर, आकाशवाणी पेठ, बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. वैभव हा मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याने राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.Nagpur News : आई गेल्यावर आत्याने मायेने सांभाळलं, पण एका घटनेने तिचंही कुटुंब संपलं; बचावलेल्या ‘अबोल’ आकांक्षाची दहावीत चमकदार कामगिरी
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून अधिक तपास सुरू आहे. वैभव हा परिसरात मनमिळावू आणि मोकळ्या स्वभावाचा म्हणून ओळखला जात होता. त्याच्या अचानक जाण्याने मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, अलीकडच्या काळात तरुणांमध्ये मानसिक तणाव, नैराश्य, कौटुंबिक समस्या, आर्थिक अडचणी तसेच व्यसनाधीनतेमुळे आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता सामाजिक स्तरातून व्यक्त केली जात आहे. छोट्या-छोट्या कारणांवरून अनेक तरुण टोकाचे निर्णय घेत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी मुलांशी संवाद वाढवणे, मानसिक आधार देणे आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन समाजातील विविध घटकांकडून करण्यात येत आहे.
Mumbai Watermelon Death Case : अब्दुल्लांना मूत्रपिंड विकार, पत्नीला थायरॉईड; त्या रात्री त्रास सुरु होताच पहिला संपर्क कोणाला? चौकशीला सुरुवात
सात दिवसांची पोलिस कोठडी
दरम्यान, बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी गुरूवारी लातूर येथून अटक केलेली होती. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास बीड न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा न्यायाधीश एस.आर.शिंदे मॅडम त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना गुरुवारी बीड पोलिसांच्या विशेष पथकाने लातूर येथून अटक केली होती.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा