• Tue. Jun 9th, 2026
    Onion Price Drop: कांद्याचे भाव घसरले! क्विंटलला 50 रुपये दर, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप

    Onion Price Drop: कांद्याच्या सतत घसरत असलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

    सटाणा कांदा शेतकरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, सटाणा: अवकाळी पाऊस, गारपीट आणि उत्पादन खर्चाच्या वाढत्या ओझ्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आता कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे आणखी भर पडली आहे. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि. ७) कांद्याला अवघा ५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि बाजार समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    बागलाण तालुक्यातील कऱ्हे येथील शेतकरी जितेंद्र साळुंखे यांनी आपला कांदा विक्रीसाठी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत आणला होता. मात्र लिलाव प्रक्रियेदरम्यान त्यांच्या कांद्याला केवळ ५० रुपये प्रति क्विंटल इतकाच दर मिळाल्याचे समोर आले. हा दर ऐकताच उपस्थित शेतकरी संतप्त झाले. आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले असताना बाजारातही योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संतप्त शेतकऱ्यांनी कांदा भरलेला ट्रॅक्टर थेट बाजार समितीच्या कार्यालयासमोर उभा करून आंदोलन सुरू केले. ‘उत्पादन खर्चही निघत नाही, मग शेती करायची कशी?’ असा सवाल करून शेतकऱ्यांनी व्यापारी संगनमताने कमी दर देत असल्याचा आरोप केला; तसेच बाजार समिती प्रशासन शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यात अपयशी ठरत असल्याची टीकाही करण्यात आली.

    महिलांनी आरोप करताच प्रांताधिकारी पळाला, संजय राऊतांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

    घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी, गणेश सोनवणे आणि बाळासाहेब टिळेकर यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी व्यापारी, बाजार समिती प्रशासन आणि शेतकरी यांच्यात मध्यस्थी करीत चर्चा घडवून आणली. दीर्घ चर्चेनंतर अखेर संबंधित कांद्याला १७५ रुपये प्रति क्विंटल दर देण्याचे मान्य करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

    Maharashtra TimesNashik News: सिंहस्थ कुंभ तीन लाख कोटींचा! 15 हजार कोटींच्या करारामुळे नाशिकला पुढील 20 वर्षे होणार फायदा
    लासूरला ठिय्या
    वाळूज :
    लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी झालेल्या लिलावात कांद्याला फक्त शंभर रुपये क्विंटल दर मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध केला. या वेळी मिळालेल्या भावात कांदा उत्पादनाचा खर्च निघत नसल्याचा आरोप करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा