• Tue. Jun 9th, 2026

    Heat Stroke: राज्यात उष्णतेची तीव्र लाट! तीन महिन्यांत उष्माघाताचे 163 रुग्ण; 3 संशयितांचा मृत्यू, अहवालानंतर कारण होणार स्पष्ट

    Heat Stroke: राज्यात उष्णतेची तीव्र लाट! तीन महिन्यांत उष्माघाताचे 163 रुग्ण; 3 संशयितांचा मृत्यू, अहवालानंतर कारण होणार स्पष्ट

    Maharashtra Heat Stroke: राज्यभरात उष्माघाताचे 163 रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन संशयितांचा मृत्यू झाला असा संशय आहे. अहवालानंतर कारण होणार स्पष्ट.

    heatstroke(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई: राज्यात उष्म्याचा तडाखा वाढता असून, एक मार्च ते तीन मे या कालावधीत राज्यात उष्माघाताचा त्रास झालेल्या १६३ रुग्णांची नोंद झाली आहे, तर तीन जणांचा मृत्यू हा उष्माघातामुळे झाल्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाकडून वैद्यकीय विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे मृत्यू नेमके कोणत्या कारणांमुळे झाले याबाबत निश्चितपणे सांगता येणार आहे.

    आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सर्वाधिक रुग्णसंख्या ही छत्रपती संभाजीनगर येथे नोंदवण्यात आली असून, येथे ४६ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. नंदुरबार येथे २२, नाशिकमध्ये १४, अमरावतीमध्ये १० आणि बुलढाणा येथे ११ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. किनारी भागामध्ये तापमान आणि आर्द्रतेमुळे गंभीर उष्माघाताच्या रुग्णसंख्या कमी असल्याचे दिसते.

    Maharashtra TimesWatermelon Deaths : वैद्यकीय उपचार मिळण्यात साडेपाच तास विलंब, डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणी नवी अपडेट, पोस्टमार्टममध्ये काय?
    अहिल्यानगरमध्ये दोन, सोलापुरात एक मृत्यू
    मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढता असला तरीही उष्माघाताचा त्रास झालेल्या एकाही रुग्णाची नोंद अद्याप झालेली नाही, तर ठाणे येथे एका व्यक्तीला त्रास झाल्याचे दिसते. अहिल्यानगर येथे दोन, तर सोलापूरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू उष्माघातामुळे झाला आहे. राज्यामध्ये उष्माघाताचा त्रास झालेल्या रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

    Maharashtra TimesKishori Pednekar यांची महापौरांच्या खुर्चीकडे धाव; रितू तावडेंच्या अनुपस्थितीत सभागृहात गोंधळ, काय घडलं नेमकं?
    विजेची मागणी गेली तीस हजार मेगावॉटवर
    चंद्रपूर वीज केंद्रातील ५०० मेगावॉटचा नववा संच बॉयलर ट्यूब लिकेजने सोमवारी रात्री अडीच वाजता बंद पडला. या संचाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज, बुधवारी सकाळपर्यंत तो पूर्ववत सुरू होण्याचे स्पष्ट संकेत वीज केंद्राच्या सूत्रांनी ‘मटा’शी बोलताना दिली. वीज केंद्राचे तीन ते आठपर्यंतचे सर्व संच सुरळीत सुरू असून मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी वीज केंद्र सज्ज असल्याची पुष्टीही सूत्रांनी जोडली.
    राज्यात कमाल तापमानात काहीशी घट झाली असली तरी उकाडा कायम आहे. त्यामुळे विजेची मागणी यंदाच्या मोसमात मंगळवारी प्रथमच ३० हजार मेगावॅटवर पोहोचली. परिणामी महावितरणसमोर ही यंत्रणा सुरक्षित ठेवण्याचे आणि ग्राहकांना अखंडित सेवा देण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा