• Wed. Jun 17th, 2026

    ‘टीबी मुक्त भारत’ अभियान झोपडपट्ट्यांपर्यंत नेण्याचा राज्यपालांचा संकल्प – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 2, 2026
    ‘टीबी मुक्त भारत’ अभियान झोपडपट्ट्यांपर्यंत नेण्याचा राज्यपालांचा संकल्प – महासंवाद

    मुंबई,दि.2:‘टीबी मुक्त भारत अभियान’ मुंबईतील प्रत्येक झोपडपट्टीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी शुक्रवारी लोकभवन, मुंबई येथे व्यक्त केला आहे.

    महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त लोकभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपालांनी ‘टीबी मुक्त भारत – लोकभवन महाराष्ट्र उपक्रम’ या विषयावरील पोस्टरचे अनावरण केले.

    उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्यपालांचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या देशातून क्षयरोग निर्मूलनाच्या आवाहनाशी सुसंगत असल्याचे सांगितले.

    मुंबईतील दाट लोकवस्तीच्या झोपडपट्ट्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

    *****

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed