• Sat. Jun 6th, 2026
    Pune Crime : ‘नराधमाला आमच्या ताब्यात द्या’, नसरापुरात महिला आणि ग्रामस्थ आक्रमक

    भोरच्या नसरापूरमध्ये जी घटना घडली यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी गावात मोर्चा काढला आहे. तसेच महिलांना गावात ठिय्या मांडला आहे. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी महिलांकडून केली जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकलीवर एका वृद्धाने अत्याचार करुन तिचा खून केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे नसरापूर गावामध्ये संतापाची लाट पसरली आहे. संबंधित घटना ही शुक्रवारी (1 मे) सायंकाळी समोर आली. या घटनेच्या निषेधार्थ आज (2 मे)ग्रामस्थांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. ग्रामस्थांनी कालही रास्ता रोको आंदोलन केलं होतं. यानंतर आज गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

    आरोपी नराधमाला आमच्या ताब्यात द्या. नाहीतर त्याला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. नसरापुरातील भैरवनाथ मंदिरापासून मोर्चा सुरु झाला आहे. या मोर्चाता गावातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मोर्चेकरांनी आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी पोलिसांसमोर ठिय्या मांडला आहे. पोलिसांकडून ग्रामस्थांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत.

    गावकरी काय म्हणाले?

    “कालची जी घटना घडली आहे ती अतिशय खालच्या पात्रतेची आहे. ही घटना समाजाला कलंक लावणारी आहे. अशा नराधमाला चौकात फाशी दिली पाहिजे, अशी सर्व ग्रामस्तांची मागणी आहे. 2018 मध्ये एक कायदा पारित झालेला आहे. अशाप्रकारे 12 वर्षाखालील मुलींवर अत्याचार झाला तर त्याला जागेवर फाशी दिली पाहिजे. काल पुण्याचे एसपी आले होते. त्यांनी सर्व ग्रामस्थांना आश्वासन दिलं आहे की, ही केस 15 दिवसांच्या आत मार्गा लावतो. पण आमची इच्छा आहे की, याला 15 दिवस वगैरे लावायला नको. आरोपीला ताबोडतोब जागेवर फाशी दिली पाहिजे. सरकारने न्याय दिला नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ आणि पंचक्रोशितील सर्व लोकं न्याय मिळवून देऊ. आम्हाला दिलेलं आश्वासन पूर्ण झालं नाही तर आम्ही परत रास्ता रोको आंदोलन करु”, असा इशारा गावकऱ्यांना दिला.

    महिलांचा प्रतिक्रिया काय?

    “शाळा इथे आहे. किती पोरी शिकायला आहेत. बालवाडीपासून ते चौथीपर्यंत शाळा आहे. सगळ्या मुली आहेत. 501 मुली इथे शिकायला आहेत. त्यांना कसंकाय शिकवायचं?”, असा सवाल गावातील एका महिलेने केला आहे.

    ‘मी घरात गेल्यानंतर पाच मिनिटांनी नराधम चिमुकलीला घेऊन गेला’

    एका मुलीने देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “मी आले आणि घरात प्रवेश केला तेव्हा पीडित चिमुकली बाहेर खेळत होती. त्यानंतर पाच मिनिटांनी आरोपी चिमुकलीला घेऊन गेला असं सीसीटीव्हीत दिसत आहे. पाच मिनिटांसाठी आमची चूक झाली असं वाटतंय”, अशी प्रतिक्रिया गावातील एका मुलीने दिली.

    “आरोपीकडून ऑलरेडी दोन गुन्हे झाले आहेत. तुम्ही आतापर्यंत काय केले? आतापर्यंत तुम्ही काहीच करु शकला नाहीत. तो खुलेआम फिरतोय, तुम्ही त्याला कायद्यात ठेवायला हवं होतं. तुम्ही त्याला सोडलं का? आता सोडू शकत नाही ते कशावरुन? परत तो काहीना काही करेल. त्यापेक्षा गुन्हे घडवायचेच नाहीत. त्याला आमच्यासमोर फाशी द्या. नाहीतर त्याला आमच्या हातात द्या”, अशी मागणी एका महिलेने केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा