• Sun. Jun 7th, 2026

    NCP Leader Death: राष्ट्रवादीच्या माजी आमदारांचे झोपेतच निधन; हृदयविकाराच्या झटक्याने सुरेशकुमार जेथलिया यांची प्राणज्योत मालवली

    NCP Leader Death: राष्ट्रवादीच्या माजी आमदारांचे झोपेतच निधन; हृदयविकाराच्या झटक्याने सुरेशकुमार जेथलिया यांची प्राणज्योत मालवली

    Jalna News: संपर्कशैलीमुळे कार्यकर्ते त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधत आणि आपल्या समस्या मांडत असत. जिल्हाभरात त्यांनी लोकाभिमुख नेते म्हणून विशेष स्थान निर्माण केले होते.

    राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे झोपेत हृदयविकाराच्या झटक्याने निधन; तालुक्यावर पसरली शोककळा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जालना: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. पहाटे 5 वाजताच्या सुमारास परतूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेथलिया यांच्या निधनाची बातमी समजताच परतूर-मंठा मतदारसंघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात शोककळा पसरली असून कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

    सुरेशकुमार जेथलिया हे परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघातील एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. आमदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांवर मोठ्या प्रमाणात भर दिला. रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा तसेच ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी त्यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करत अनेक विकासकामे मार्गी लावली.

    सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे, त्यांच्या अडचणी समजून घेणारे आणि प्रत्येकाशी आत्मीयतेने संवाद साधणारे नेतृत्व म्हणून सुरेशकुमार जेथलिया यांची वेगळी ओळख होती. कार्यकर्त्यांमध्ये त्यांची मजबूत पकड होती. 15 मे 2025 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत त्यांनी हा राजकीय निर्णय घेतला होता. नुकत्याच पार पडलेल्या परतूर नगर परिषद निवडणुकीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. अत्यंत काट्याच्या लढतीत नगराध्यक्षपद थोडक्यात हुकले असले, तरी त्यांच्या निवडणूक नियोजनशैलीची सर्वत्र चर्चा झाली होती. शेवटपर्यंत कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

    दरम्यान, सुरेशकुमार जेथलिया यांच्या अचानक झालेल्या निधनाने परतूर-मंठा मतदारसंघाने एक अभ्यासू, विकासाभिमुख आणि लोकांशी घट्ट नाळ जुळलेला नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते, समर्थक आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मोठी गर्दी केली. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा