Prakash Ambitkar On Ajit Pawar and Patangrao Kadam: भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या ३१व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आबिटकर बोलत होते.
अक्षय ऊर्जा व दुग्धविकास मंत्री अतुल सावे, भारती विद्यापीठचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, कुलसचिव जी. जयकुमार, आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे, डॉ. के. डी. जाधव या वेळी उपस्थित होते.
El Nino Alert: भारतावर मोठं संकट! ‘एल निनो’मुळे हवामानात होणार उलथापालथ, काय सांगतो WMOचा अहवाल
भारती हॉस्पिटल येथील नूतनीकरण केलेल्या एकत्रित महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्यालय, नेत्ररोग विभाग व नेत्रपेढी; तसेच आय. व्ही. एफ. सेंटरचे उद्घाटन आणि विद्यापीठाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. संशोधन क्षेत्रात यश मिळवणाऱ्या प्राध्यापकांना गौरविण्यात आले.
‘राज्यातील रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा, यासाठी योजनेचा विस्तार करण्यात येत आहे. रुग्णालयांना उपचारानंतर मिळणारा निधी वाढविला आहे. आगामी काळात मेंदूविकार, अस्थिरोग, कर्करोग या आजारांच्या रुग्णांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी योजनेत सुधारणा करणार असल्याचेही आबिटकर यांनी नमूद केले.
Amit Thackeray : ‘त्यांच्यात मुंबई बंद करण्याची ताकद नाही, मराठी रिक्षा चालक मुंबई सुरळीत ठेवतील’; अमित ठाकरेंचं वक्तव्य; म्हणाले, ‘गावी जा…’
डॉ. विश्वजित कदम म्हणाले, ‘भारती विद्यापीठाचे लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे शैक्षणिक संकुल उभे राहणार आहे. पुण्यात क्रीडासंकुल उभारण्यात येणार आहे.’ डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, ‘शिक्षणात तंत्रज्ञान हे सहायक साधन आहे, पर्याय नाही. शिक्षणात मानवी मूल्य, नैतिकता आणि संवेदनशीलता टिकवून ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे.’ डॉ. राजेंद्र उत्तुरकर, प्रा. डॉ. ज्योती मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले.
Devendra Fadnavis: फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महादेव बालगुडे अटकेत, नेमका आरोप काय?
पुणे, मुंबईप्रमाणेच आता छत्रपती संभाजीनगरचा विकास होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग व्यवसायात लवकरच एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक कंपन्या संभाजीनगरमध्ये येत आहेत. औद्योगिक विकासामुळे मनुष्यबळाची आवश्यकता मोठी आहे. वैद्यकीय व्यवस्थेचीही गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे. -अतुल सावे, अक्षय ऊर्जा व दुग्धविकास मंत्री
