Shivaji Maharaj Book Controversy: सध्या हे पुस्तक साऊ प्रकाशन संस्थेच्या वतीने पानसरे यांनी जे मूळ पुस्तक लिहिले, ते जसेच्या तसे प्रकाशिक केले जात आहे. काही प्रकाशकांनी पानसरे यांच्या हत्येनंतर त्यामध्ये डॉ. जयसिंगराव पवार यांची प्रस्तावना वाढवली आहे.
ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांनी सन १९८८मध्ये शिवाजी कोण होता? हे पुस्तक लिहिले. ७२ पानांचे हे पुस्तक ‘ लोकवाङ्मय ’ या संस्थेने प्रकाशित केले, तेव्हा त्याची किंमत पाच रुपये होती. छत्रपती शिवाजी महाराजांची वेगळी प्रतिमा अतिशय कमी शब्दांत पानसरे यांनी उभी केली. ती वाचकांना प्रचंड भावली. यामुळे त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत गेला. आमदार संजय गायकवाड यांनी ‘साऊ प्रकाशन’चे प्रशांत आंबी यांना पुस्तकाचे नाव बदलण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली.
Kolhapur Crime: घरचा माणूस गेला, कुटुंब दु:खात; अंत्यविधीला विकृतानं संधी साधली; 16 तोळे सोन्याचे दागिने लंपास
प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले. यामुळे नावावरून हे पुस्तक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. यामुळे या पुस्तकाविषयी पुन्हा उत्सुकता निर्माण होऊन त्याला मागणी वाढली. चार दिवसांत दहा हजारांवर प्रती खपल्या. राज्यभरातून प्रकाशकाकडे चौकशी सुरू झाली. प्रती संपल्याने तातडीने या पुस्तकाची छपाई सुरू करण्यात आली आहे.
चार संस्थांकडून पुस्तकाचे प्रकाशन
‘लोकवाङ्मय’, ‘श्रमिक प्रतिष्ठान’, ‘समाजवादी प्रबोधिनी’ आणि ‘साऊ प्रकाशन’ या चार संस्थांच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन केले जात आहे. पुस्तकाच्या नावावरून आतापर्यंत अनेकदा वाद झाला; पण पानसरे यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यावर पडदा पडत गेला.
‘ही धोक्याची घंटा, आज नकाशा काढला, उद्या शिवाजी महाराजांवर पडदा पडू शकतो’, राजमाता Kalpanaraje Bhosale आक्रमक
चार दिवसांत पुस्तकाला प्रचंड मागणी वाढली आहे. एक हजार, दोन हजार अशा ऑर्डर येत आहेत. पण, सध्या सर्व पुस्तके संपल्याने नव्याने छपाई सुरू करण्यात आली आहे. –प्रशांत आंबी, प्रकाशक
