रिक्षा आणि टॅक्सीचालकांना करण्यात आलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयामुळे अमराठी वाहन चालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिलाय. या मुद्यावरून आक्रमक झालेल्या मनसेनेही या संपावर जाणाऱ्या चालकांवर पलटवार केला. धमकी देणाऱ्यांना मराठी माणसांनी धडा शिकवायला हवा. मुंबई आणि महाराष्ट्राला बाहेरचे कुणीही वेठीस धरू शकत नाही, अशा कडक शब्दांत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुनावलं.