बीड न्यायालयात बहुचर्चित सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना धनंजय देशमुख यांनी न्यायालयीन प्रक्रिया आणि सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर आपली रोखठोक भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, सध्या सुरू असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकारणापेक्षा आपल्या भावाला न्याय मिळवून देणे ही बाब त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाची आहे असं ते म्हणाले.