राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकरिता सर्वच पक्षातील राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. रूपाली पाटील यांनी देखील विधान परिषदेची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रूपाली पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून इच्छा व्यक्त केली आहे. मी सक्षम नेतृत्व आहे, लढवय्या आहे असं म्हणत रूपाली पाटील यांनी या संधीची मागणी केली आहे. घराणेशाही सोडून पक्षातील इतर महिलांना संधी द्यावी अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली.अजितदादा असते तर मागणी करण्याची वेळच आली नसती असं रुपाली पाटील म्हणाल्या.