No Water in Pune Thursday : गुरुवारी संपूर्ण पुण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पर्वती, वारजे, लष्कर जलकेंद्रांमधील दुरुस्तीच्या कामामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे. एवढच नाही तर शुक्रवारीही आता पाण्याचा पुरवठा हा पुणेकरांच्या सोयीवर परिणाम करणारा ठरणार आहे.
या ठिकाणी दुरुस्तीची कामे
या कामांमध्ये नवीन व जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, खडकवासला जॅकवेल, वारजे, वडगाव, लष्कर जलकेंद्र आदी ठिकाणी विद्युत, पंपिंग व स्थापत्य दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश भागांना पाणीपुरवठा होणार नाही.
या परिसरात परिणाम
पर्वती जलसाठा क्षेत्रांतर्गत अनेक ठिकाणी पाणी मिळणार नाही. तसेच सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, कात्रज, धनकवडी, आंबेगाव, कोंढवा या भागांनाही फटका बसणार आहे.
दरम्यान, हडपसर, मुंढवा, मांजरी, फुरसुंगी, खराडी, चंदननगर, विमाननगर, विश्रांतवाडी, लोहगाव या पूर्व भागातील परिसरातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पश्चिम भागातील कोथरूड, बावधन, वारजे, बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण, सुस रोड परिसरालाही याचा मोठा परिणाम होणार आहे.
Kalyan-Ahilyanagar Highway Accident : कल्याण-नगर महामार्ग अपघातात एका कुटुंबातील तिघांसह महसूल अधिकारीही दगावला; आजी आश्चर्यकारकरीत्या बचावली, मृतांची नावे समोर
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१७ एप्रिल) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा व सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बालगंधर्व रंगमंदिरात “मँगो मस्ती”चा जल्लोष; ३ मिनिटांत ३ आंबे फस्त करत मुलांची धमाल स्पर्धा
स्नेहल निमगिरे, पुणे : आंब्याचा सिझन सुरू होताच पुण्यात “मँगो मस्ती”चा रंगतदार उत्सव पाहायला मिळाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही “महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव” अंतर्गत “आंबे खा स्पर्धा” मोठ्या उत्साहात पार पडली. ही अनोखी आणि आकर्षक स्पर्धा बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. लहान मुलांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसरात आनंदमय वातावरण निर्माण झाले होते.
या स्पर्धेत एकूण ३५ लहान मुला-मुलींनी सहभाग घेतला. स्पर्धेचा मुख्य उद्देश फक्त आंबे खाणे नसून, आंब्याचा सिझन साजरा करणे आणि मुलांमध्ये आनंद निर्माण करणे हा होता. स्पर्धा सुरू होताच मुलांनी आंब्यांवर अक्षरशः ताव मारायला सुरुवात केली. काही मुलांनी वेगाने आंबे खाल्ले तर काहींनी हसत-खेळत गोड रसाचा आनंद घेतला. अवघ्या ३ मिनिटांत ३ आंबे फस्त करण्याचा विक्रमही काही मुलांनी केला.
स्पर्धेदरम्यान आंब्याचा रस सर्वत्र पसरल्याने मुलांचे हात आणि चेहरे पूर्णपणे रंगून गेले होते. हे दृश्य पाहून उपस्थित पालक आणि प्रेक्षकांनीही टाळ्यांचा गजर केला. लहान मुलांच्या निरागसतेमुळे आणि उत्साहामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला.
या स्पर्धेत ओम प्रफुल्ल शिंदे या मुलाने केवळ २ मिनिटांत ३ आंबे खाऊन पहिला क्रमांक पटकावला. त्याच्या वेगवान आणि उत्साही सहभागाचे सर्वांनी कौतुक केले. तर अनवी आणि सानवी या मुलींनी आंबा खाताना चेहरा आणि हात सर्वाधिक रंगवत विशेष आकर्षण निर्माण केले. त्यांच्या आनंदी प्रतिक्रियांमुळे वातावरण अधिकच हसतमुख झाले.
विजेत्या मुला-मुलींना बक्षीस म्हणून आंब्यांची पेटी देण्यात आली. तसेच सर्व सहभागी मुलांना प्रमाणपत्रे आणि आंब्यांचा गोड आस्वाद देण्यात आला. मुलांनी मिळालेल्या बक्षिसांमुळे आनंद व्यक्त केला.
या कार्यक्रमाला मनसेचे सरचिटणीस गणेश सातपुते, गणेश धुमाळ, बाळासाहेब ढमाले, मयूर चिल्लाळ, रूपाली भुजबळ, तेजस्विनी धुमाळ तसेच अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. आयोजकांनी सांगितले की, अशा स्पर्धांमुळे मुलांमध्ये आनंद, एकता आणि स्थानिक फळांबद्दल आकर्षण वाढते.
आंब्याच्या गोड सुवासाने आणि मुलांच्या हास्याने बालगंधर्व रंगमंदिर परिसर “मँगो फेस्टिव्हल”सारखा फुलून गेला होता. कार्यक्रमाचा शेवट टाळ्यांच्या गजरात आणि आनंदी आठवणींसह झाला.
