खासदार अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ‘ऑपरेशन टायगर’ आणि निधी वाटपातील भेदाभेदावर आपली रोखठोक भूमिका मांडली. खोटी बातमी देणाऱ्यांविरोधात ते सोमवारी न्यायालयात जाणार असून, त्यांनी बंडखोर आमदारांच्या स्नेहभोजनावरही भाष्य केले.
‘उद्धवजींनी माझं कौतुक केलं, बैठकीत ऑपरेशन टायगर असा विषय नव्हता ’; मातोश्रीतील बैठकीनंतर खासदार अरविंद सांवंत यांची प्रतिक्रिया(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) अंतर्गत सुरू असलेल्या घडामोडींना आणखी वेग आला असून ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर खासदार अरविंद सावंत यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अलीकडे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सावंत यांच्यासह काही खासदारांची नावे प्रसिद्ध झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच संबंधित वृत्तपत्रांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबतही या बैठकीत भूमिका ठरवण्यात आल्याची माहिती आहे. सावंत यांनी यापूर्वीच अशा वृत्तांविरोधात कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, महत्त्वाच्या चर्चेनंतर सावंत हे मातोश्रीमधून बाहेर पडले असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली स्पष्ट भूमिका मांडली. या संपूर्ण प्रकरणावर आता अरविंद सावंत कायदेशीर नोटीस बजावण्याच्या तयारीत असून, सोमवारी न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
सावंत नेमकं काय म्हणाले?
अरविंद सावंत म्हणाले की, मातोश्रीवर झालेली बैठक ही भारतीय कामगार सेना आणि पक्षाच्या संघटनात्मक कामाबद्दल होती. “मी दररोज मातोश्रीवर जातो, तिथे माझा वावर असतो. उद्धवजींनी उलट माझे कौतुक केले आणि अभिनंदन केले. ज्या बातम्या पसरवल्या गेल्या, त्या केवळ ‘विकाऊ पत्रकारितेचा’ नमुना आहेत. जे घडलेच नाही, ते घडले असे भासवले जात आहे,” असा टोला त्यांनी लगावला.लेखी खुलासा देण्याच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, “आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, जे बोलतो ते ठामपणे बोलतो. पण माध्यमांनी वेगळा अर्थ काढू नये, म्हणून मी स्पष्ट भूमिका मांडली.”
Satara Crime : ‘त्याला जिवंत ठेवणार नाही’; मुलीशी चॅटिंग-भेटीचा राग, वडील-भावांनी 18 वर्षीय तरुणाला पित्यासमोरच संपवलं
‘निधी वाटपात सरकारचा दुजाभाव’
पुढे बोलताना सांवत म्हणाले की, “सरकार विकासकामांत भेदभाव करत आहे. मी दक्षिण मुंबईचा खासदार असूनही, एका साध्या कार्यकर्त्याला किंवा माजी खासदाराला राहुल शेवाळेना ८-८ कोटींचा निधी दिला जातो, मग अनिल देसाई किंवा मला का डावलले जाते? निवडणूक संपली की आपण सर्वांचे बांधील असतो, हे शिवसेनाप्रमुखांचे विचार विद्यमान सरकार विसरले आहे.”
स्नेहभोजनावर म्हणाले…
शिंदे गटाच्या मंत्र्यांकडे पक्षाच्या काही खासदारांनी स्नेहभोजनाला जाण्यावरही त्यांनी भाष्य केले. “कोणी कुठे जावे हे ज्याचे त्याने ठरवावे. पण ज्यांनी उद्धवजींच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या घरी जेवायला जायचे का? हा विचार प्रत्येक खासदाराने स्वतःच्या विवेकाने केला पाहिजे. उद्धवजींचे मन मोठे आहे, ते अशा गोष्टींवरून त्रागा करत नाहीत. पण आपण वागताना आपल्या शिवसैनिकाला काय वाटेल, याचा विचार करणे आवश्यक आहे.”
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा