समरजीत घाटगेंच्या भाजपवापसीच्या निर्णयाने शरद पवारांना मोठा धक्का मानला जातोय.विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.यानंतर आता पुन्हा समरजीत घाटगेंनी भाजपात जाण्याचा मोठा निर्णय घेतला.समरजीत घाटगेंच्या या निर्णयाचे त्यांच्या समर्थकांनी स्वागतच केले आहे.मुख्यमंत्री फडणवीस आणि समरजीतराजे भावासारखे आहेत, असेही समर्थकांनी नमूद केले.राष्ट्रवादीत असतानाही फडणवीसांसोबत कायम संपर्क असल्याचा खुलासाही त्यांनी केला.