BEST Bus: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सुरू होऊन अनेक वर्ष झाली असली तरी या मार्गावरील अनेक प्रवासी बेस्टने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत. अनेक कारणांमुळे मेट्रो उपलब्ध असूनही बसने हे प्रवासी दररोज प्रवास करतात.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मुंबई शहरांत दिवसेंदिवस मेट्रोचे जाळे विस्तारत चालले आहे. शहरात सर्वात पहिली मेट्रो घाटकोर ते अंधेरीदरम्यान सुरू झाली. दररोज, हजारो नागरिक या मेट्रोचा लाभ घेतात. मेट्रो लाइन 1 ला सुरू होऊन अनेक वर्ष झाले असतील तरी घाटकोपर ते अंधेरी प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून अजूनही बेस्ट बसला पसंती देण्यात येत आहे. घाटकोपर पश्चिम रेल्वे स्थानक ते अंधेरी पूर्वेतील आगारकर चौकापर्यंत A-340ही बस जाते. मेट्रो 1 सुद्धा त्याच मार्गावरून धावत असली तरी नागरिक बसला जास्त पसंती देत आहेत.
अधिक बस थांबे
बसला मेट्रोपेक्षा अधिक प्रतिसाद मिळण्याचं एकच कारण, बस सहजपणे उपलब्ध आहे. घाटकोपर ते अंधेरी मार्गावर मेट्रोमध्ये केवळ 8 स्थानकं आहेत. पण बस क्रमांक A-340च्या मार्गावर याच अंतरादरम्यान, 20 थांबे आहेत. त्यामुळे प्रवाशांना जास्त कनेकटीव्हीटी मिळते. शहरांत प्रवास करताना प्रवाशांसाठी ‘लास्ट माइल कनेकटीव्हीटी’ अत्यंत महत्त्वाची आहे. कर्मचार्यांना कार्यालयाजवळ पोहोचवणे महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रवासी बसने प्रवास करण्याला प्राधान्य देतात.Mumbai Metro: मेट्रो प्रकल्पांना अखेर मुहूर्त! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मेट्रो 9 आणि 2 बी’चे उद्घाटन; 7 एप्रिलापासून शुभारंभ
प्रत्येक दोन मेट्रो स्थानकांच्यामध्ये 3-5 बसचे थांबे आहेत. तसेच, हे थांबे नेहमीच्या प्रवाशांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या ठिकाणी आहेत. प्रवाशांना बस अधिक जवळ पोहोचवते. त्यामुळे मेट्रोच्या सहज प्रवासापेक्षा ते बसचे धक्के खात प्रवास करण्याला पसंती देतात. ही बेस्ट बस चाकला, जे बी नगर, मरोळ, साकी नाका सारख्या ठिकाणांवरून जाते. या भागांत अनेक कंपन्यांची कार्यालय असून कर्मचाऱ्यांना बस अधिक सोयीस्कर वाटते.
Mumbai Local: गर्दीच्या वेळी लोकलमध्ये गर्भवती महिलांचे हाल, स्वतंत्र राखीव डब्याची मागणी; महापालिका प्रस्ताव मांडणार
तिकीट दर एक सारखेच
दरम्यान, पीक आव्हरवेळी मेट्रोमध्ये तुडूंब गर्दी असते. बसमध्ये गर्दी असली तरी श्वास घेण्यासाठी जागा असते आणि कोंडल्या सारखे वाटते असे समीर मोरे या प्रवाशाचे म्हणणे आहे. दरम्यान, या दोन्ही मार्गांवरती एक सारखेच भाडे आहे. घाटकोपर ते अंधेरी दरम्यान, 20 रुपये मेट्रो आणि एसी बसचं पण भाडं तेवढचं आहे. मेट्रोमध्ये चढायला, मेट्रो स्थानकावरून रवाना व्हायला आणि परत खाली उतरायला जितका वेळ जातो तेवढ्यात बसने बरेच अंतर पार होते. यामुळे फक्त 4-5 मिनिटे वेळ वाचततो, तरी कर्मचाऱ्यांसाठी हे 5 मिनिटेही मोलाचे असतात असे काही प्रवाशांचे मत आहे.
A-340 बसने दररोज, 850 प्रवासी प्रवास करतात. तसेच, सकाळी गर्दीच्या वेळी दर 5 ते 10 मिनिटांनी बस उपलब्ध असल्यामुळे प्रवास करणं सोपं होतं.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा