राज्यातील राजकारणात पुन्हा भूंकप होणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेनेतील किती आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, याचा थेट आकडाच त्यांनी जाहीर केला. सोबतच संजय राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यावरही भाष्य केलं. देशातील संविधानिक संस्था या भाजपच्या अधीन झाल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी पत्रकार परिषदेत या सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर जहरी टीका केली. राऊत पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले पाहा…