कोपरगावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांत नवरी घरातील पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता त्या नवरीला शोधून काढण्यात पोलिसांना मोठं यश आलं. पोलिसांनी लग्नाच्या नावाने अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.