• Sat. Jun 6th, 2026

    Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुन्हा अपघात, IIT मुंबईच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू; लोणावळ्याजवळ सकाळी दुर्घटना

    Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुन्हा अपघात, IIT मुंबईच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू; लोणावळ्याजवळ सकाळी दुर्घटना

    Mumbai-Pune Expressway Accident: बुधवारी द्रुतगती मार्गावरील भीषण दुर्घटनेनंतर गुरूवारी सकाळी पुन्हा एकदा अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाला आहे. या थरारक अपघतात गाडीचा चेंदामेंदा झाला आहे

    अमुलकुमार जैन, खोपोली: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरच मृत्यूने घाला घातल्याची धक्कादायक घटना मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर घडली. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या भीषण अपघातामुळे एक्सप्रेसवे पुन्हा एकदा ‘डेथ ट्रॅप’ ठरला असून, केवळ दोन दिवसांत सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गुरूवारी सकाळी लोणावळ्याजवळ झालेल्या या भीषण अपघातात आयआयटी मुंबईच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

    कार पलटी झाल्यामुळे अपघात

    आज सकाळी तीन तरूण लोणावळ्यावरून मुंबईच्या दिशेने निघाले होते. या वेळी त्यांची पोलो कार पलटी होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ओमकुमार बोरसे (वय 23), लय भारत (वय 22) आणि श्रेयांश शर्मा या तीन तरुणांचा कारमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. हे तिघेही पवई येथील आयआयटी मुंबई येथे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे.Maharashtra TimesMumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नवीन बोगद्याजवळ भीषण अपघात, गाडीवर कंटेनर उलटला; तिघांचा जागीच मृत्यू

    मिळालेल्या माहितीनुसार, हे तरुण काल मुंबईहून कारने लोणावळा येथे गेले होते. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे ते पुन्हा मुंबईकडे परतत असताना एक्सप्रेसवेवर कार रेसिंग सुरू झाले. ओव्हरटेकच्या नादात पोलो कार पलटी होऊन हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

    बुधवारीही अशीच एक दुर्घटना

    ही घटना ताजी असतानाच काल घडलेला आणखी एक भीषण अपघात अद्याप सर्वांच्या स्मरणात आहे. काल एका कंटेनरने समोरील पाच वाहनांना चिरडल्याने इनोव्हा कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेनंतर अवघ्या 24 तासांत पुन्हा तीन बळी गेल्याने एक्सप्रेसवेवरील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

    Maharashtra TimesSangli Crime : मंदिरात दर्शन घेऊन परतताना घात, सांगलीतील शिक्षण संस्था संचालकाला घराजवळ संपवलं, कुटुंबाचा आक्रोश

    अपघाताची माहिती मिळताच पनवेल पोलीस, ‘देवदूत’ यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य ॲम्ब्युलन्स आणि हेल्प फाउंडेशनचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकांनी मोठ्या शिताफीने कारमध्ये अडकलेल्या तरुणांना बाहेर काढले; मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून काही तासांनंतर वाहतूक सुरळीत केली. सलग घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे “एक्सप्रेसवेवर प्रवास करणे सुरक्षित आहे का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा