• Sun. Jun 7th, 2026
    Yavatmal Crime: बळजबरीने पळविले मात्र, मुलांना नव्हे! चौकशीनंतर कामठवाडातील घटनेचं बिंग फुटले

    Yavatmal Crime: मुले पळविण्याच्या संशयातून गावकऱ्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी तालुक्यातील कामठवाडा येथे रविवारी सकाळी समोर आली आहे.

    यवतमाळ क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: घाटंजी तालुक्यातील कामठवाडा गावात रविवारी सकाळच्या सुमारास काही गावकऱ्यांना एक कार संशयास्पद अवस्थेत दिसली. सात-आठ जण एकाला कापड झाकून घेऊन जात होते. गावकरी जवळ जाऊ लागताच चालकाने कार पळविली. हे लोक मुले पळविणारे असल्याचा समज झाल्याने गावकऱ्यांनी कारचा पाठलाग केला. पांढुर्णा खुर्द गावाजवळ कार उलटली. गावकऱ्यांनी कारमधील लोकांना चोप दिला. नंतर विचारपूस केली असता आर्थिक वादातून त्यांनी उत्तर प्रदेशातील संजय सोनकर (५०) यांना मुकुटबनमधून पळवून आणल्याचे स्पष्ट झाले.

    कामठवाडात रविवारी सकाळच्या सुमारास गावकऱ्यांना एक संशयास्पद कार दिली. गावकऱ्यांनी जवळ जाण्याचा प्रयत्न करताच चालकाने कार भरधाव पुढे नेली. काही क्षणात ही माहिती गावात पसरली. गावकऱ्यांनी तातडीने शेजारच्या गावांशी संपर्क साधत मुलांना घेऊन जाणारी टोळी येत असल्याची माहिती देऊन कारचा पाठलाग सुरू केला. याच सुमारास कारचे समोरील दोन्ही टायर फुटले; तरीही चालकाने वाहन लोखंडी चाकांवरच रस्त्यावरून पळविले. त्यामुळे पाठलाग करणाऱ्या ग्रामस्थांचा संशय अधिकच वाढत गेला. पांढुर्णा खुर्द गावाजवळ कार उलटली.

    Maharashtra TimesLPG Gas Cylinder: यवतमाळमध्ये गॅसची साठेबाजी! एकाच घरातून 40 सिलिंडर जप्त; भंडारा, गोंदियातही कारवाई
    अपघातानंतर गाडीतून बाहेर पडलेले काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले; मात्र संतप्त ग्रामस्थांनी त्यातील काहींना पकडून बेदम मारहाण केली. रागाच्या भरात कारचीही तोडफोड करण्यात आली. अधिक चौकशीत ही मुले पकडणारी टोळी नसल्याचे स्पष्ट झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

    Maharashtra TimesUnseasonal Rain: यवतमाळला अवकाळी फटका! गारपिटीमुळे गहू, हरभऱ्याचे मोठे नुकसान; भंडारा, वर्धा, नागपुरातही बरसल्या सरी
    आर्थिक वादातून अपहरण
    दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथील राहुल नेमाडे (२६), रामा जाधव (३९), विलास नागपुरे (२४), उमरेश नाईक (४६), अविनाश तायडे (२०) आणि सौरभ खोपे (१९) यांनी सोनकर यांना मुकुटबन येथून बळजबरीने कारमध्ये बसवून आणल्याचे समोर आले. या घटनेमागे आर्थिक व्यवहारातील वाद असल्याची माहिती पुढे आली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा