Yavatmal Crime: मुले पळविण्याच्या संशयातून गावकऱ्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी तालुक्यातील कामठवाडा येथे रविवारी सकाळी समोर आली आहे.
कामठवाडात रविवारी सकाळच्या सुमारास गावकऱ्यांना एक संशयास्पद कार दिली. गावकऱ्यांनी जवळ जाण्याचा प्रयत्न करताच चालकाने कार भरधाव पुढे नेली. काही क्षणात ही माहिती गावात पसरली. गावकऱ्यांनी तातडीने शेजारच्या गावांशी संपर्क साधत मुलांना घेऊन जाणारी टोळी येत असल्याची माहिती देऊन कारचा पाठलाग सुरू केला. याच सुमारास कारचे समोरील दोन्ही टायर फुटले; तरीही चालकाने वाहन लोखंडी चाकांवरच रस्त्यावरून पळविले. त्यामुळे पाठलाग करणाऱ्या ग्रामस्थांचा संशय अधिकच वाढत गेला. पांढुर्णा खुर्द गावाजवळ कार उलटली.
LPG Gas Cylinder: यवतमाळमध्ये गॅसची साठेबाजी! एकाच घरातून 40 सिलिंडर जप्त; भंडारा, गोंदियातही कारवाई
अपघातानंतर गाडीतून बाहेर पडलेले काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले; मात्र संतप्त ग्रामस्थांनी त्यातील काहींना पकडून बेदम मारहाण केली. रागाच्या भरात कारचीही तोडफोड करण्यात आली. अधिक चौकशीत ही मुले पकडणारी टोळी नसल्याचे स्पष्ट झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Unseasonal Rain: यवतमाळला अवकाळी फटका! गारपिटीमुळे गहू, हरभऱ्याचे मोठे नुकसान; भंडारा, वर्धा, नागपुरातही बरसल्या सरी
आर्थिक वादातून अपहरण
दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथील राहुल नेमाडे (२६), रामा जाधव (३९), विलास नागपुरे (२४), उमरेश नाईक (४६), अविनाश तायडे (२०) आणि सौरभ खोपे (१९) यांनी सोनकर यांना मुकुटबन येथून बळजबरीने कारमध्ये बसवून आणल्याचे समोर आले. या घटनेमागे आर्थिक व्यवहारातील वाद असल्याची माहिती पुढे आली.
