अमेरिका – इस्रायल विरुद्ध इराण सुरु असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम हा आखाती देशांवर होत आहे.या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुदलाचे निवृत्त विंग कमांडर विनायक पटवर्धन यांच्याशी चर्चा केली.या युद्धाचा भारतावर फार मोठा परिणाम होईल असं वाटत नाही असं विनायक पटवर्धन म्हणाले.या युद्धाकडे बघण्याचा भारताचा दृष्टिकोन हा तटस्थ स्वरूपाचा आहे आणि तो योग्यच आहे असंही पटवर्धन यांनी सांगितलं.