Bike Accident: दर्शन आणि साई हे दोन्ही सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली असून, एकाच कुटुंबातील दोन चिमुरड्यांचा अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माळेगाव येथील तीन मुले दुचाकीने तेल्हारा शहराकडे होळीसाठी बाजार करायला जात होती. शेरी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका आयशर वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्या मुलाने रुग्णालयात नेताना वाटेतच प्राण सोडले.
मृतांची नावे:
१. दर्शन रामेश्वर वैष्णव (वय १६ वर्षे)
२. साई रामेश्वर वैष्णव (वय १२ वर्षे)
३. गणेश दीपक आपतुरकर (वय १६ वर्षे)
अपघातानंतर संबंधित आयशर वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते तेल्हारा पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे. तिन्ही मृतदेहांचे तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून, पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे. माळेगाव सारख्या छोट्या गावातून बाहेर पडलेल्या या तीन उमद्या मुलांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी संताप आणि दुःख व्यक्त केले जात आहे, सणाच्या तोंडावर घडलेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात दुःखाचे सावट पसरले असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
