• Wed. Mar 11th, 2026
    Ahilyanagar Accident : भल्यापहाटे काळाची झडप, कार अन् ट्रकचा भीषण अपघात; त्रिकोणी कुटुंबासह चौघांचा करुण अंत

    Ahilyanagar Car Accident : अहिल्यानगरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

    अहिल्यानगर दौंड महामार्ग अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावर कोळगाव शिवारातील माऊली मंदिराजवळ आज मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील आई-वडील आणि मुलासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि इको कार यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात इको गाडीचा चालक नितीन अनिल कोकाटे (वय 22, रा. काष्टी) यांच्यासह गाडीत प्रवास करणारे गजानन जनार्धन पायघन (वय 47 ), दुर्पा गजानन पायघन (वय 36) आणि त्यांचा मुलगा वैभव गजानन पायघन (वय 19) यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, कुटुंबातील करण गजानन पायघन (वय 13) हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

    कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    पायघन कुटुंब मूळचे अकोले तालुक्यातील पातूर येथील मळतूर गावचे असून, कामानिमित्त ते सध्या श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथे वास्तव्यास होते. आज मंगळवारी पहाटे ते गावाकडून चिंभळेकडे येत असताना कोळगाव शिवारात दौंडकडून नगरकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या इको कारला समोरून जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. या दुर्घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
    Maharashtra TimesRaj Thackeray Japan Girl : ‘या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद!’ राज ठाकरेंनी मानले तरुणीचे आभार, पण का?

    पती-पत्नीसह तरुण बेपत्ता

    जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चांगतपुरी गावाजवळ काल रात्री एक भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट उजव्या कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत कारमधील पती-पत्नीसह त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला स्थानिक तरुण असे तिघेजण बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पोलिसांकडून शोधकार्य सुरू आहेत.
    Maharashtra TimesJay Patil : चेन्नई बीच दुर्घटनेतील जयची बॉडी सापडली, आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश

    नेमकं काय घडलं?

    कारमधील मुखीद शेख आणि निलोफर मुखीद शेख (रा. कोरडगाव, ता. शेवगाव) हे प्रवासी तर रावसाहेब खडेकर असं बचावकार्यासाठी पाण्यात उतरलेला स्थानिक बेपत्ता तरुणाचं नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल सोमवारी रात्री 11 ते 11:30च्या सुमारास अलताफ पठाण हे आपली स्विफ्ट कार एमएच 12 केजे 9032 घेऊन जात होते. कारमध्ये त्यांच्यासोबत मुखीद शेख आणि त्यांच्या पत्नी निलोफर मुखीद शेख हे प्रवास करत होते. चांगतपुरी गावाजवळील कालव्याच्या पुलाजवळ चालकाला रस्त्याचा अंदाज आल्यामुळे कार कालव्यात कोसळली.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा