Ahilyanagar Car Accident : अहिल्यानगरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.
कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
पायघन कुटुंब मूळचे अकोले तालुक्यातील पातूर येथील मळतूर गावचे असून, कामानिमित्त ते सध्या श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथे वास्तव्यास होते. आज मंगळवारी पहाटे ते गावाकडून चिंभळेकडे येत असताना कोळगाव शिवारात दौंडकडून नगरकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या इको कारला समोरून जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. या दुर्घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
Raj Thackeray Japan Girl : ‘या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद!’ राज ठाकरेंनी मानले तरुणीचे आभार, पण का?
पती-पत्नीसह तरुण बेपत्ता
जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चांगतपुरी गावाजवळ काल रात्री एक भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट उजव्या कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत कारमधील पती-पत्नीसह त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला स्थानिक तरुण असे तिघेजण बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पोलिसांकडून शोधकार्य सुरू आहेत.
Jay Patil : चेन्नई बीच दुर्घटनेतील जयची बॉडी सापडली, आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश
नेमकं काय घडलं?
कारमधील मुखीद शेख आणि निलोफर मुखीद शेख (रा. कोरडगाव, ता. शेवगाव) हे प्रवासी तर रावसाहेब खडेकर असं बचावकार्यासाठी पाण्यात उतरलेला स्थानिक बेपत्ता तरुणाचं नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल सोमवारी रात्री 11 ते 11:30च्या सुमारास अलताफ पठाण हे आपली स्विफ्ट कार एमएच 12 केजे 9032 घेऊन जात होते. कारमध्ये त्यांच्यासोबत मुखीद शेख आणि त्यांच्या पत्नी निलोफर मुखीद शेख हे प्रवास करत होते. चांगतपुरी गावाजवळील कालव्याच्या पुलाजवळ चालकाला रस्त्याचा अंदाज आल्यामुळे कार कालव्यात कोसळली.
