शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. ‘पक्षप्रमुखांना परखड भूमिका घ्यावी लागेल’ असे मत नुकतेच त्यांनी व्यक्त केले. पूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला विकत घेणं शक्य नव्हतं, असे सांगताना जाधवांनी हे विधान केले. जि. प., पं. समिती, नगरपालिकेच्या विजयी व पराभूत उमेदवारांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.