स्थानिक निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेले दिसले. साताऱ्यात भाजपने जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढवली होती. यावेळी गणेश नाईक, जयकुमार गोरेंनी शंभूराज देसाईंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र देसाई गटाने जि. परिषद व पं. समितीत चमकदार कामगिरी केली. पाटणमधील विजयी सभेत देसाईंनी गणेश नाईक, जयकुमार गोरेंना टोला लगावला.