• Sun. Mar 8th, 2026
    Jalgaon News: जळगाव हादरलं! दोन चिमुकल्यांसह ओल्या बाळंतिणीची मृत्यूला मिठी, स्वत:च्याच शेतातील विहिरीत…, काय घडलं असं?

    Jalgaon News: जळगावातून धक्कायक माहिती समोर आली आहे. २८ वर्षीय महिलेने तिच्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेत जीवन संपवलं. काय घडलं असं?

    jalgaon death(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.प्रतिनिधी, जळगाव: उमर्टी (ता. चोपडा, ता. जळगाव) येथे एका २८ वर्षीय महिलेने आपल्या अवघ्या अडीच वर्षांच्या मुलासह आणि १५ दिवसांच्या नवजात बाळासह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. बुधवारी ही घटना समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    काय घडलं असं?
    पमिता डोंगरसिंग पावरा (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. मुलगा वीरेन आणि १५ दिवसांच्या बाळाचा बुडून मृत्यू झाला. या महिलेने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

    पमिता ही काही दिवसांपूर्वीच बाळंतीण झाली होती. विश्रांतीसाठी ती आपल्या माहेरी आली होती. चार दिवसांपूर्वी पती तिला सासरी घेऊन आला होता. त्यानंतर ती मोठा मुलगा व १५ दिवसांच्या नवजात बाळासह मंगळवारी (दि.२७) बेपत्ता झाली होती. शोध सुरू असताना बुधवारी पमितासह दोघे मुले असे तिघांचे मृतदेह उमर्टी शिवारातील त्यांच्या स्वतःच्याच शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आले.

    Maharashtra TimesJalgaon Crime : शाळेत जाणाऱ्या दोन चिमुकलींना विहिरीत ढकलून निर्घृण हत्या, गावामध्ये तणावपूर्ण परिस्थिती, काय घडलं?
    या घटनेबाबत मृत महिलेचा भाऊ आकाश पावरी याने पोलिसांत तक्रार दिली. त्याच्या म्हणण्यानुसार पमिताची प्रसूती होऊन केवळ १५ दिवस झाले असल्याने तिला आणखी काही दिवस माहेरी विश्रांती घेऊ द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, सासरच्या मंडळींनी काहीही न ऐकता तिला जबरदस्तीने सासरी नेले. मंगळवारी ती बेपत्ता असल्याची आणि बुधवारी तिचा मृत्यू झाल्याची माहिती सासरकडूनच देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांचे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

    Maharashtra TimesJalgaon Accident : महिनाभरापूर्वी कार घेतली, लकी-ड्रॉमध्ये बक्षिस लागलं, माहिती घेऊन परतताना आक्रित घडलं; आजोबा-नातूला काळानं हिरावलं
    तर दुसरीकडे, सांगलीत विश्रामबाग रेल्वे स्थानकाजवळ गुरूवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रेल्वेची धडक बसल्याने तेजस मारुती सुपे (वय २०, रा. वाढा, ता. खेड, जि. पुणे) हा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारा युवक ठार झाला. याबाबत संजयनगर पोलिसात नोंद झाली आहे. तेजस सुपे हा सांगलीतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात आर्टीफिशियल एंटेलिजल्स (एआय) अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होता. गुरूवारी सकाळी सातच्या सुमारास विश्रामबाग रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा