अक्कलकोटमध्ये युती फिस्कटल्यानंतर माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा संताप अनावर.
“पोलिसांना नासाच्या चंद्रयानावर पाठवा”
गेल्या चार वर्षांपासून अक्कलकोटमध्ये दबावाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप म्हेत्रे यांनी केला. “आमच्यासोबत एखादा कार्यकर्ता फिरला की पोलीस लगेच त्याच्यावर धाड टाकतात. आपले पोलीस स्कॉटलंड यार्डच्याही पुढे गेले आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पोलिसांच्या अति-तत्परतेवर उपरोधिक टोला लगावताना ते म्हणाले, “नासाच्या माध्यमातून अमेरिका चंद्रावर काय करतेय, हे पाहण्यासाठी आपल्या पोलिसांना तिकडे पाठवायला हवे. या पोलिसांबाबत आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत.”
“भारताचा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही”
ओबीसी आणि मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाबाबतही म्हेत्रे यांनी गंभीर इशारा दिला आहे. “ओबीसींच्या जागांवर जनरल उमेदवारांना उभे करून त्यांचा हक्क हिरावला जात आहे. जर असाच अन्याय सुरू राहिला, तर देशात असंतोषाचा भडका उडेल. १४२ कोटी जनता रस्त्यावर उतरली, तर वरून देव आला तरी वाचवू शकणार नाही. परिस्थिती हाताबाहेर गेली तर भारताचा श्रीलंका किंवा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही,” असे खळबळजनक विधान त्यांनी केले.
Crime News : धडाकेबाज कारवाई: छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेचा लातूरमध्ये छापा; 16 लाखांचे अंमली सिरप जप्त
अक्कलकोटमधील या राजकीय संघर्षाने आणि म्हेत्रे यांच्या विधानांनी सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सुषमा अंधारे यांनी घेतली सरवदे कुटुंबीयांची भेट; तपासावर प्रश्नचिन्ह
मनसेचे दिवंगत नेते बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची शिवसेना (उद्धव ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी भेट घेतली. सरवदे यांच्या पत्नी वंदना आणि त्यांच्या दोन लहान मुलींना अंधारे यांनी धीर देत लाडाने गोंजारले. यावेळी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींवर अद्याप गुन्हा दाखल नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी थेट जेलरोड पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्याला फोन करून जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
