राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी शिवसेनेला संपवण्याची भाषा केल्यानंतर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. म्हस्के यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना उद्देशून पत्र लिहून नाईक यांच्या वक्तव्यावर खदखद व्यक्त केली आहे. युतीतील पक्षाला संपवण्याची मागणी करणे हे पक्ष नेतृत्वावर अविश्वास दाखवण्यासारखे आहे, असे म्हस्के यांनी म्हटले आहे.