मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अंबादास दानवे यांच्याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. पण अंबादास दानवे यांनी उदय सामंत यांचा दावा फेटाळला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्याबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं. अंबादास दानवे लवकरच आमच्या पक्षात आलेले बघायला मिळतील, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांच्या या वक्तव्यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी उदय सामंत यांचा दावा फेटाळला. तसेच आपल्याला लोकसभा निवडणुकीपासून विविध पक्षांकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर येत असल्याचं म्हटलं. पण अशा ऑफरला अर्थ नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
“मला वाटतं उदय सामंत असं बोलले नाहीत. तुम्हाला स्पष्ट सांगायचं तर मी त्यांनाच फोन केला होता. मला त्यांनी सांगितलं की ते काय म्हणाले. त्यांचं वक्तव्य फार गंभीरपणे घेण्याची गरज नाही. मी शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणारा शिवसैनिक आहे. त्यांच्यावर रोज टीका करतो म्हणून त्यांना पत्रकारांनी अशा पद्धतीने प्रश्न विचारला आणि त्यांनी म्हणून अशा पद्धतीने उत्तर दिलं. पण माझ्या टीकेचा जोर आणखी वाढेल हे देखील मी सांगतो. त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होणार नाही”, असं रोखठोक प्रत्युत्तर अंबादास दानवे यांनी दिलं. Girish Mahajan : ‘बाबासाहेबांची ओळख संपवायचं काम करायचं नाही’, गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, नाशिकमधला नेमका वाद काय? वाचा A टू Z “चर्चेला आपण काही करु शकत नाही. निश्चित काही लोकं मैत्रीमध्ये बसल्या-उठल्यावर बोलत असतात की, असं तसं. आता सगळेच लोक बोलत असतात. भाजपचे लोक ग्रामपंचायतीच्या लोकांनाही बोलत असतात”, असं अंबादास दानवे म्हणाले.
“मला असं वाटतं मी संघटनेचं काम करणारा शिवसैनिक आहे. आता नाही तर मागच्या 30 वर्षांपासून काम करणारा शिवसैनिक आहे. पक्षाने माझ्यावर खूप मोठमोठ्या जबाबदारी दिल्या आहेत. आताही माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी समर्थपणे पेलण्याची ताकद माझ्यात यावी ही मी शिवसेनाप्रमुखांकडे प्रार्थना करत असतो. बाकी मी संकटांना घााबरणारा शिवसैनिक नाही”, असंदेखील दानवे यांनी स्पष्ट केलं. Sambhaji Bhide : ‘शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोही’, संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य, राष्ट्रवादीची गुन्हा दाखल करण्याची मागणी दरम्यान, अंबादास दानवे यांना यावेळी पत्रकारांनी शिवसेना आणि भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर आली का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी “ती येत असते. लोकसभा निवडणुकीपासून ऑफर येत आहेत. त्याला काही अर्थ नसतो”, असं उत्तर दिलं.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा