Metro Phase 2: नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा वेगाने पूर्ण होत आहे. डिसेंबर २०२७ पर्यंत हा टप्पा कार्यान्वित होईल. यामुळे जामठा स्टेडियमला पोहोचणे सोपे होईल. मेट्रोचे जाळे ८३.८ किलोमीटरपर्यंत विस्तारणार आहे. प्र
नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यानंतर दुसरा टप्प्यातील कामानेही गती घेतली आहे. दुसऱ्या टप्प्यात मेट्रो ४३.८ किलोमीटर मार्गावर धावणार असून ३२ टक्के काम पूर्ण झाले आहे. एप्रिल २०२४मध्ये हे काम हाती घेण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात मेट्रो ४३.८ किलोमीटर मार्गावर धावेल. ट्रान्स्पोर्टनगर (कापसी) आणि पश्चिमेकडील हिंगणा, उत्तरेकडील कन्हान, दक्षिणेतील बुटीबोरी एमआयडीसीपर्यंत मेट्रो पोहोचेल. फेज-१ आणि फेज-२ मिळून नागपुरात मेट्रोचे ८३.८ किलोमीटरचे जाळे तयार होत आहे. केवळ ट्रॅकची एकच निविदा काढणे बाकी आहे. पुढील सहा महिन्यांत ही निविदाही काढण्यात येईल. प्रकल्पासाठी आवश्यक जमीनही मिळाली आहे. आजच्या स्थितीला मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण होत असून मुदतीच्या आत दुसऱ्या टप्प्यातील कामही पूर्ण होईल, असा विश्वास महामेट्रोने व्यक्त केला आहे.
Mumbai Railway Stations: मुंबईत रेल्वे स्थानकांवर मोठे बदल! 2184 कोटींचा खर्च, भुयारी मार्ग, 16 पूल, नवे प्लॅटफॉर्म; कुठे?
अशी होणार सुविधा
सध्या नागपूर मेट्रो रेल्वे ‘लोकमान्यनगर ते प्रजापतीनगर’ आणि ‘ऑटोमोटीव्ह चौक ते खापरी’ अशी धावत आहे. चारही बाजूने मेट्रोचा विस्तार होत आहे. खापरीच्या पुढे बुटीबोरी आणि त्यापुढे एमआयडीसी ईएसआरपर्यंत मेट्रो जाईल. या मार्गात अशोकवन मेट्रोस्थानक आहे. जामठा येथे जाण्यासाठी अशोकवन येथे उतरावे लागेल. तिथून अवघ्या ५०० मिटर अंतरावर जामठा स्टेडियम आहे. जानेवारी २०२७मध्ये ‘ऑटोमोटीव्ह चौक ते लेखानगर’ हा ६.७ किलोमिटरचा मार्ग पूर्ण होईल. सध्या या मार्गावर ७०टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२७मध्ये दुसरा टप्पा पूर्ण होणार आहे, असे महामेट्रोचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी यांनी सांगितले.
Thane Metro Trial Run LIVE : ठाणेकरांचे स्वप्न साकार, मेट्रो ४ ची ट्रायल; CM Fadnavis-Shinde LIVE
प्रकल्पाची सद्यस्थिती
१४ लाँचरच्या (मशिन्स) साहाय्याने प्रकल्पाचे काम सुरू
सद्यास्थितीत एकूण ४४ किलोमिटर क्षेत्रात काम सुरू
३२पैकी २८ स्थानकांचे काम प्रगतीपथावर
उर्वरित स्थानकांवरही महिनाभरात कामास सुरुवात
चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत ८५० कोटींची कामे पूर्ण.
आर्थिक वर्ष संपेपर्यंत १ हजार ५० कोटींचे काम पूर्ण होण्याचा अंदाज
दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी ५ हजार ४०० मनुष्यबळ कार्यरत
कुशल मनुष्यबळ बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा येथून आणले आहे
