जालनासह राज्यभरात महिला अन्याय अत्याचार घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यामध्ये प्रामुख्याने घरगुती हिंसाचार वाढले आहेत…
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी ही कालपासून घरातून बेपत्ता होती. तिचा पती अमोल जोगदंड याने अश्विनीचा भाऊ संदीप खरात याला फोन करून ती बेपत्ता असल्याची माहिती दिली. बातमी समजताच संदीपने तातडीने वरखेडी गाठले आणि बहिणीचा शोध सुरू केला. मात्र, काही वेळातच पती अमोलने अश्विनीचा मृतदेह गावाशेजारील विहिरीत तरंगत असल्याची धक्कादायक माहिती दिली. संदीपने विहिरीकडे धाव घेतली असता, तिथे जे दृश्य दिसले त्याने काळजाचा थरकाप उडाला. आपली बहीण विहिरीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून भावाने एकच टाहो फोडला.
भावाचे पतीवर गंभीर आरोप
याप्रकरणी मयत अश्विनीचा भाऊ संदीप खरात याने पती अमोल जोगदंड याच्यावर हत्येचा गंभीर आरोप केला आहे. “माझा भावजी बहिणीला नेहमी मारहाण आणि त्रास द्यायचा. तिचे चारित्र्य आणि घरगुती वादातून हा प्रकार घडला असावा,” असा संशय संदीपने व्यक्त केला आहे.
Chhatrapati Sambhajinagar Election: निवडणूक प्रशासनाची मोठी कारवाई, तब्बल 155 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, कारण काय?
अश्विनीचे वडील मुंबईत मोलमजुरी करतात आणि आईचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. अशा परिस्थितीत पित्याने लाडक्या लेकीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून कष्ट केले, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
दोन गोंडस मुले पोरकी; पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे अश्विनीच्या दोन चिमुकल्या मुलांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अश्विनीने स्वतः उडी घेऊन आत्महत्या केली की तिची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आता शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. सध्या जिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून, पोलिसांनी पुढील तपासाला वेग दिला आहे.
