मुंबईसह २९ महापालिकांसाठी आज मतदान पार पडले. मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा थेट सामना झाला. एक्झिट पोलनुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला १३८ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेना उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीला ६२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. निकाल उद्या जाहीर होईल.
जनमतच्या एक्झिट पोलनुसार, मुंबई महानगरपालिकेत शिवसेना उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शप यांच्या युतीला ६२ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजप, शिंदेसेनेच्या महायुतीला १३८ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांना २० जागा मिळती, असा अंदाज आहे. मुंबई महापालिकेत एकूण २२७ प्रभाग येतात. सत्ता स्थापन करण्यासाठी ११४ नगरसेवकांचा पाठिंबा गरजेचा असतो. हा आकडा महायुती अगदी सहज पार करत असल्याचं जनमतच्या एक्झिट पोलमधून दिसत आहे.
BMC Election: सर, कशाला एवढं? कार्यकर्त्यांनी फोन तपासताच धक्कादायक प्रकार समोर; निवडणूक अधिकाऱ्याची गयावया
तब्बल नऊ वर्षांनंतर मुंबईत महापालिकेची निवडणूक झाली. या नऊ वर्षांत राजकारण पूर्णपणे बदललं. २०१७ मध्ये अखेरची निवडणूक झाली होती. त्यावेळी शिवसेना एकसंध होती. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात लढलेल्या शिवसेनेनं २२७ पैकी ८४ जागा जिंकत पहिला क्रमांक पटकावला. तर भाजपनं ८२ जागा जिंकल्या होत्या. २०१२ च्या तुलनेत भाजपच्या जागा अडीच पट वाढल्या. तेव्हा भाजपला केवळ ३१ जागांवर समाधान मानावं लागत होतं.
Maharashtra Municipal Election: शाई पुसली जात असल्याचे प्रकार, ठाकरे बंधू कडाडले; निवडणूक आयोगकडून तातडीनं स्पष्टीकरण जारी
२०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यानंतर गेल्या चार वर्षांत शिवसेनेच्या अनेक माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेसेनेत उडी घेतली. त्यामुळे मुंबईतील ठाकरेंची ताकद बरीच घटली. ठाकरे ब्रँडच संकटात आला. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा आणि मनसेची युती झाली. ठाकरे बंधू एकत्र आले. यंदा मुंबईत ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असा थेट सामना होत आहे. तर काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडी सोबत हातमिळवणी केली आहे.
