Maharashtra Municipal Election : राज्यभरातील 29 महापालिकांच्या क्षेत्रात मतदान पार पडत आहे. हे मतदान पार पडत असताना राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडली. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्वत: यावेळी भूमिका मांडली.
“राज्य निवडणूक आयोग हे मारकर पेन 2011 पासून वापरत आहेत. ही शाई लावल्यानंतर 10 ते 12 सेकंद लागतात. हे 10 ते 12 सेकंद मतदार हा मतदारकेंद्रातच असतो. ही शाई सुकल्यानंतर ती कुठल्याहीप्रकारे काढता येत नाही. ही शाई वेगळी नाही. ती शाई केंद्रीय निवडणूक आयोग वापरते तीच शाई आहे. एखादा मतदार मतदान केंद्रात मतदान केल्यानंतर पुन्हा मतदान करायला आला, तर मतदान केंद्राचा अध्यक्ष, प्रिसायडींग ऑफिसर हे त्या संबंधित व्यक्तीवर नक्कीच कारवाई करतील”, असं राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं.
“हा संभ्रम पसरवला जात आहे. ही शाई आम्ही 2011 पासून वापरतोय. आता मारकरपेनच्या माध्यमातून शाई वापरत आहोत. त्यामुळे याच निवडणुकीत अशाप्रकारचा संभ्रम पसरवणं हे चुकीचं आहे. याशिवाय लोकशाही आणि विधानसभा निवडणुकीतही अशाप्रकारच्या तक्रारी होतात. शाई सुकल्यानंतर पसरत नाही. आम्ही कोरस कंपनीचे 2011 पासून वापरतोय. एकाच कंपनीचे मारकर पेन वापरतोय”, अशी माहिती दिनेश वाघमारे यांनी दिली.
BMC All Candidate List : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुमच्या प्रभागात कोणाकोणात लढत? वाचा A टू Z यादी
“दुबार मतदार आहेत. दुबार मतदारांची पूर्ण ओळख पटवून दिल्याशिवाय मतदान करु दिलं जात नाही. मुंबई महापालिकेत दुबार मतदारांना दोन ओळखपत्र मागितले जात आहेत. मतदार कक्षामध्ये मतदान प्रतिनिधी आहेत, जे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत, ते त्या प्रभागामधलेच आहेत. त्यामुळे असा मतदार आढळला जो पुन्हा मतदान करण्यासाठी आला त्यावर नक्की मतदान केंद्र कारवाई करेल”, असा इशारा दिनेश वाघमारे यांनी दिली. “शाईच्या प्रकरणाची आम्ही चौकशी करु. शाई पुसली जाते असा फेक नरेटिव्ह पसरवला जात आहे”, असं वाघमारे यांनी स्पष्ट केलं.
यावेळी पत्रकारांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत दिनेश वाघमारे यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी “सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निवडणूक आयोग निष्पक्ष काम करत आहे. कुठल्याही प्रकारचा फेवरेटीम आम्ही करत नाहीत. संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व गोष्टी निवडणूक आयोगावर ढकलल्या जात आहेत. मतदार यादींमध्ये त्यांचा क्रमांक अॅपमध्ये शोधायला पाहिजे होता. मतदारांचीदेखील जबाबदारी आहे. मतदारांना मतदार यादी पुरवण्यात आली आहे. मतदारांनी वेळेवर त्यांचं नाव शोधून योग्य त्या पोलिंग स्टेशनवर जायला पाहिजे”, असं मत दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केलं.
KDMC Election Candidate List : कल्याण-डोंबिवलीतील सर्व उमेदवारांची A टू Z यादी, ऐतिहासिक नगरीत इतिहास घडणार?
“पाडू नावाच्या मशीनबाबतचा आक्षेप पूर्णपणे चुकीचा आहे. पाडू हे यंत्र 2004 पासून आहे. आम्ही हे यंत्र नवीन आणलेलं नाही. ज्यावेळेस व्हीव्हीपॅट नव्हतं, त्यावेळेस पाडूद्वारे कंट्रोल युनिटकडून रिझल्ट वेळेवर डिस्प्ले झाला नाही तर पाडू वापरची तरतूद आहे. मी ऑब्जर्वर अनेक ठिकाणी होतो. मी ऑब्जर्वर असताना त्या त्या ठिकाणी त्याचा वापर झालेला आहे. पाडू अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत वापरतो”, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
