Harshwardhan Sapkal: भाजप ही विरोधी नेत्यांना खाणारी चेटकीण आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरमध्ये केली.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी सपकाळ शुक्रवारी नगरला आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी खासदार नीलेश लंके, काँग्रेसचे शहराध्यक्ष दीप चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक कळमकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Jaydeep Kawade : ‘रामकृष्ण हरी, निलेश लंके यांना बसवा घरी’; मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेत कवाडेंची फटकेबाजी
सपकाळ म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी केली जात आहे. उमेदवारांना धमकावले जात आहे, पैशांचे आमिष दाखवून अर्ज भरू दिला जात नाही किंवा मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. पोलिस यंत्रणा, प्रशासन व निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बटिक बनले आहे.
लोकशाहीत निवडणुका निकोप, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडल्या पाहिजेत; पण त्याला हरताळ फासला गेला आहे. सत्तेचा खेळ नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसची लढाई आहे. विरोधकांना प्रचार करता येऊ नये यासाठी सत्ताधारी पक्ष त्यांची कोंडी करत आहे. उमेदवारांना धमकावण्यासाठी खुलेआम बंदुका, कोयते घेऊन फिरत आहेत. राज्यात अकोट, सोलापूर व खोपोली या ठिकाणी आतापर्यंत तीन खून झाले आहेत.’
Ahilyanagar Crime: पोलिसांकडूनच लोकशाहीला काळिमा, शस्त्रासह उमेदवाराच्या दारात वावर, दोन अंमलदार निलंबित, काय आहे संपूर्ण प्रकरण?
‘महापालिकांच्या निवडणुका या पाणी, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर झाल्या पाहिजेत; पण भाजप महायुती मात्र यावर बोलत नाही. महापौर मराठी हवा, की ऊर्दू, खान हवा की बाण यावर भाजप व मुख्यमंत्री फडणवीस बोलत आहेत. दुसरीकडे सत्तेतील तिन मित्रपक्षच एकमेकांवर आरोप करत आहेत, हे त्यांचे फिक्सिंग आहे, नुरा कुस्ती आहे,’ असेही सपकाळ म्हणाले.
