• Sun. Jun 7th, 2026
    BMC Election: शिवाजी पार्कवर धडाडणार प्रचारतोफा! उबाठा-मनसेची 11, तर शिवसेना-भाजपची 12 जानेवारीला सभा

    Shivaji Park Sabha: शिवाजी पार्कवर धडाडणार प्रचारतोफा… ११ व १२ जानेवारीला शिवसेना उबाठा, मनसे, शिवसेना शिंदे गट, भाजपच्या प्रचारसभा होणार आहे.

    shivaji park dadar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा आणि मनसेची संयुक्त सभा ११ जानेवारीला शिवाजी पार्कमध्ये होणार आहे. या सभेला मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. १२ जानेवारीला शिवाजी पार्कवर शिवसेना आणि भाजपचीही सभा होणार आहे. यामुळे या दोन सभांना किती गर्दी होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

    राजकीय पक्ष मोठ्या सभांसाठी शिवाजी पार्क मैदानाला नेहमीच पसंती देतात. दसरा मेळावा घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ असते. यंदाच्या महापालिका निवडणुकीतील सभेसाठीही हे मैदान मिळवण्यासाठी राजकीय पक्ष पुढे सरसावले होते. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता शिवाजी पार्क मैदानातूनच करता यावी, यासाठी १० ते १३ जानेवारीच्या तारखांना अधिक मागणी होती. त्यामुळे आचारसंहिता लागू होताच सभेसाठी शिवसेना उबाठा, मनसे, शिवसेना व भाजपने महापालिकेच्या जी उत्तर वॉर्डकडे शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केले होते.

    Maharashtra TimesBMC Election: वृद्ध झाल्याने गरज संपली! ठाकरेंकडून मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले, पक्षांतराचे संकेत
    शिवाजी पार्क मैदानासाठी मनसेकडून स्वतंत्र अर्ज महापालिकेकडे करण्यात आला होता. सभेसाठी ११ जानेवारी आणि १२ जानेवारीसाठी मनसेकडून अर्ज महापालिकेला देण्यात आला होता. तर शिंदे यांच्या शिवसेनेने ११ ते १३ जानेवारीपैकी एका दिवसासाठी अर्ज सादर केला होता.

    भाजपनेही शिवाजी पार्क मिळवण्यासाठी धडपड केली आणि महापालिकेकडे अर्ज केला होता. अखेर शिवसेना उबाठा-मनसेला ११ जानेवारीला शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली आहे. १२ जानेवारीला शिवसेना आणि भाजपला सभेसाठी परवानगी मिळाल्याचे सांगण्यात आले. विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना उबाठाने शिवाजी पार्कमध्ये सभा घेतली होती.

    Maharashtra TimesBMC Election: काँग्रेसविना महापौर अशक्य; निवडणुकीनंतर मुंबईत आघाडीचे भाई जगताप यांचे संकेत
    ठाकरेंना मुंबईशी देणेघेणे नाही – आशीष शेलार
    ठाकरे बंधूंना मुंबईकरांशी काही देणेघेणे नाही. मुंबईत आलेल्या पुराच्या वेळी ठाकरे बंधू कुठे होते ? मुंबईकरांसाठी ते कधी रस्त्यावर आले आहेत का’, असे प्रश्न करत भाजपचे नेते आणि मंत्री आशीष शेलार यांनी गुरुवारी ठाकरे बंधूंना लक्ष्य केले . ‘यांनी केवळ चित्रपट बघायचे व फाफडा जिलेबी खायची ’, असा टोलाही त्यांनी लगावला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा