• Sat. Jun 6th, 2026

    Chhatrapati Sambhajinagar : ‘खोक्यावर विकल्या गेलेल्यांनी आम्हाला नीतीमत्ता शिकवू नये; इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर पलटवार

    Chhatrapati Sambhajinagar : ‘खोक्यावर विकल्या गेलेल्यांनी आम्हाला नीतीमत्ता शिकवू नये; इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर पलटवार

    Chhatrapati Sambhajinagar News : एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी शिरसाट व महायुती सरकारवर तीव्र आरोप करत प्रशासकीय गुंडगिरी, लोकशाहीची हत्या आणि नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. पक्षातील मतभेद मान्य करत त्यांनी पक्ष एकतेवर भर दिला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर : जे लोक गुवाहाटीला जाऊन खोक्यावर विकले गेले, त्यांनी माझ्यावर बोट ठेवू नये, स्वतःच्या पदाचा गैरवापर करून गोरगरीब दलित समाजाच्या जमिनी हडप करणारे आणि एमआयडीसीतील भूखंड खिशात टाकणाऱ्यांनी आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये अशा शब्दांत एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांना प्रत्युत्तर दिले आहे.

    छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत जलील यांनी शिरसाटांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना महायुती सरकारच्या गुंडगिरीवर जोरदार प्रहार केला. इम्तियाज जलील म्हणाले की, उत्तर प्रदेशातील एका घटनेचा उल्लेख करत जलील म्हणाले की जेव्हा एखादा मुख्यमंत्री लहान मुलीचा बुरखा स्वतःच्या हाताने काढतो. तेव्हा ती निंदनीय गोष्ट असते. जर कोणी म्हणत असेल की त्यांचा हात इकडे तिकडे गेला असता तर काय झाले असते? तर अशांचे हात तोडून त्यांच्याच हातात देण्याची ताकद आमच्यात आहे. ती मुलगी कोणत्याही जाती-धर्माची असो आमची भूमिका हीच राहिली असती.
    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Election : ‘आता युती म्हणजे थेट डोकेफोडी…; संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने खळबळ

    ६५ जागा बिनविरोध होणे ही लोकशाहीची हत्या

    राज्यात ६५ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या मुद्द्यावर जलील यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर प्रशासकीय गुंडगिरीचा आरोप केला. उमेदवारांना उचलून नेणे त्यांच्यावर दबाव टाकून अर्ज मागे घ्यायला लावणे ही लोकशाहीला घातक ठरणारी गुंडगिरी आहे. निवडणूक आयोग आणि प्रशासकीय यंत्रणेला खिशात टाकण्याचे काम या सरकारने केले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar : लग्नाला २६ दिवस बाकी, पत्रिका वाटायला गेलेला प्रसाद परतलाच नाही, सर्वांनी फोन लावले पण ज्याची भीती तेच घडलं, लगीनघर दु:खात बुडालं

    एमआयएममधील बंडाळी

    एमआयएममधील अंतर्गत वादावर बोलताना जलील म्हणाले की, काही लोकांनी बंडखोरी केली असली तरी ते एमआयएमचेच कट्टर समर्थक आहेत. इम्तियाज जलील महत्त्वाचा नाही. पक्ष महत्त्वाचा आहे. जर माझ्यावर कोणाची नाराजी असेल तर त्याचा फटका पक्षाला देऊ नका. औवेसी साहेबांनी मला महाराष्ट्रात काम करायला सांगितले आहे आणि मी त्यासाठी तयार आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा