राज्यभरात महापालिका निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांची धडकी भरवणारी बातमी समोर येत आहे. कारण त्यांच्या निकालाविरोधात मनसे पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचा धुराळा सुरु आहे. या निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. पण मतदानाच्या आधीच काही ठिकाणी निकाल लागल्याचं बघायला मिळत आहे. काही ठिकाणी नगरसेवकांचा बिनविरोध विजय झाल्याचं बघायला मिळत आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने किंवा काही उमेदवारांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने समोर कुणीच नसल्यामुळे संबंधित उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे मतदानाच्याआधीच 64 नगरसेवकांचा विजय झाल्याचं बघायला मिळत आहे. पण या सर्व बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांना धडकी भरवणारी बातमी समोर येत आहे. या बिनविरोध निवडणुकीच्या विरोधात मनसेने मोठा निर्णय घेतला आहे. मनसेचा या निवड प्रक्रियेला विरोध आहे. त्यामुळे मनसेने बिनविरोध निवडणुकीच्या विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
“मी माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी पाहिली नाही”, असं वक्तव्य मनले अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते अविनाश जाधव, अभिजीत पानसे, राजू पाटील यांच्यासमोर केल्याची माहिती समोर आली आहे. “बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अनेक निवडणुका पाहिल्या. पण 65 उमेदवार बिनविरोध होतात ही परिस्थिती पहिल्यांदाच पाहिली”, असं राज ठाकरे यांनी म्हटल्याची माहिती समोर येत आहे. मनसे नेते अविनाश जााधव यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.
‘मनसेच्या उमेदवाराला ऑफर, व्हिडीओ दाखवणार’
“राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली, ठाण्यातील परिस्थिती समजून घेतली. मला वाटतं त्यांच्या भाषणात या सगळ्या गोष्टी येतीलच. आम्ही त्यांना काही पुरावे दिले आहेत. कोपरीत आमच्या उमेदवाराला ऑफर देण्यात आली. त्याचा व्हिडीओ आमच्याकडे आहे. मी राज ठाकरे यांना तो व्हिडीओ दाखवला आहे. काही गोष्टी आता समोर येतील. पण परत ते देखील म्हणाले की, अशी निवडणूक कधी पाहिली नाही, असं त्याचं वाक्य होतं. मी एवढे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर तसेच आतापर्यंत निवडणूक पाहतोय, पण अशी निवडणूक पाहिली नाही की, निवडणुकाच होऊ द्यायची नाही. उमेदवारच विकत घ्यायचे हे आतपर्यंत घडलं नव्हतं. पण भाजप आणि शिवसेना आता या पातळीला उतरले आहेत”, अशी टीका अविनाश जाधव यांनी केली.”आम्ही उद्या निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहोत. त्यांना जे काही 64 ठिकाणी घडलेलं आहे त्याबाबत त्यांच्यासोबत पत्र व्यवहार करणार आहोत, म्हणजे आम्हाला कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा होईल. खरंतर त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत त्यांनी अर्ज मागे का घेतला? ते विचारा. आम्ही बिनविरोध निवडणुकीच्या विरोधात कोर्टात जाणार आहोत. लोकशाही जिवंत असेल तर नक्की परिणाम दिसून येईल. लोकं जिवंत असतील तर परिणाम दिसून येईल”, असं अविनाश जाधव म्हणाले.
“कसलं भरारी पथक, जे भरारी पथकात काम करतात ते कोण आहेत ते एकदा चेक करा. जिल्हाधिकारी किंवा महापालिकेत काम करणारी ती लोकं आहेत. जी पाच वर्षे त्या नगरसेवकाच्या दबावात काम करत असतात. ते भरारी पथक आहे. नवीन दिल्लीतून कोणतं पथक आलेलं नाही”, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा