Raigad Accident News : रायगडमधील ताम्हिणी घाटात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या बातम्या समोर येत आहेत. शुक्रवारी एकाच दिवशी दोन मोठे अपघात झाले होते. या अपघातामधील कारचालकाबाबतची माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी झालेल्या कार अपघाताची माहिती मिळताच ड्रोनच्या शूटिंगने या घाटातील कार शोधून काढण्यात आली. यामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा कारचालक सोलापूर परिसरातील असून त्याचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय होता तो अविवाहित आहे. सुरुवातीला या कार चालकाची ओळख पडली नव्हती, पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर या मृत्यू झालेल्या कारचालकाच नाव आता समोर आले आहे. शुभम आसबे राहणार सोलापूर असे या मृत्यू झालेल्या कार्यचालकाचे नाव आहे. त्याचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची माहिती घरच्यांनाही नव्हती मात्र पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून या कार चालकाची ओळख पटवली आहे. माणगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत या सगळ्याची माहिती घेतली कारचालकाला बाहेर काढलं. मात्र नेमकं कुणीकडे चालला होता कशासाठी चालला होता याची माहिती अद्याप मिळाली नाही या सगळ्याचा तपास रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस करत आहेत.
Mangesh Kalokhe Murder Case : ‘पप्पांचा चेहराही दाखवला नाही, ते कापडातच होते’; मंगेश काळोखेंच्या लेकींचा आक्रोश; उपस्थितांचे डोळे पाणावले
नोव्हेंबर महिन्यातही या परिसरात पुणे परिसरातील पर्यटकांचा भीषण अपघात झाला होता. त्यावेळी ड्रोनच्या मदतीने लागला अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेण्यात आल्यानंतर पुण्यातील सहा जणांचा मृत्यू झाल्याचं उघड झालं होत. आज पुन्हा याच परिसरात कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताच्या ठिकाणी बॅरीगेटिंग व काही उपाययोजना आवश्यक असल्याचे मत या परिसरात प्रवास करणारे वाहन चालक व प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत. कोकणातून पुण्याला जोडणाऱ्या या घाटातून रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील प्रवाशांची वाहनांची कायमस्वरूपी वाहतूक सुरू असते त्यामुळे या घाट परिसरात तात्काळ उपायोजना कराव्यात अशी मागणी आता होऊ लागली आहे.
Raigad Accident: ताम्हिणी घाटात पुन्हा थरार; खासगी बस थेट डोंगरावर जाऊन आदळली, 52 जणांचा जीव थोडक्यात वाचला, अनेक जण जखमी
शुक्रवारी सकाळी याच घाटात एका बसचा अपघात झाला होता .या अपघातात पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील सावन आय. बी. ऑटोव्हिंग प्रायव्हेट लिमिटेड (शिव महिंद्रा) शोरुम मधील कर्मचारी दोन खाजगी बसमधून रायगड जिल्ह्यातील जंजिरा मुरुड जवळील काशिद बीच येथे पर्यटनासाठी निघाले होते. यातील एका बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका अवघड वळणावर हा अपघात झाला सकाळी ११ वाजताच्या सुमारास ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावच्या हद्दीत अपघात झाला होता यामध्ये तब्बल 52 जण जखमी झाले. अपघात झाल्याचे समजताच माणगाव घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने तात्काळ मदतकार्य करून जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलवले या सगळ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. दरम्यान या घाटात तात्काळ उपायोजना कराव्यात अशी मागणी वाहन चालक व प्रवाशांकडून होऊ लागले आहे.
