Maharashtra Politics : उबाठाने १२२ पैकी ८२ जागांवर उमेदवार उभे केले असून त्यांचे आव्हान परतवून लावण्याचा प्रयत्न भाजपकडून केला गेला.
राज्यात शिवसेनेच्या फुटीत भाजपचा सहभाग महत्त्वाचा राहिला असून, त्याबाबत भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी कबुलीही दिली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात भाजप विरुद्ध शिवसेना (उबाठा) संघर्ष कायम राहिला आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेत भाजपने उबाठाला आव्हान दिले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत उबाठा व शिंदेसेनेला एकमेकांविरोधात उभे करीत भाजपने मैदान मारले. नाशिक महापालिका निवडणुकीत मात्र भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजप सोडून एकत्र येत युती केली.
BMC Election : एक बैठक आणि फडणवीसांचा मोठा निर्णय, मुंबईत महायुतीच्या 12 उमेदवारांची माघार, कारण काय?
उबाठाने महाविकास आघाडीत सामील होत भाजपला आव्हान दिले आहे. उबाठाकडून १२२ पैकी ८२ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. ‘उबाठा’चे हे आव्हान परतवून लावण्याचा प्रयत्न भाजपकडून केला गेला. उबाठाच्या सर्व उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांवर भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी हरकत घेतली होती. परंतु ती फेटाळण्यात आली. इतर महापालिकांतही हेच डावपेच भाजपकडून खेळले गेले. परंतु, त्यांना यश येऊ शकले नाही.
Kripashankar Singh : उत्तर भारतीय महापौर होणार, कृपाशंकर सिंहांच्या वक्तव्याने वाद, उदय सामंत म्हणाले, ते काही महायुतीचं…
भाजप बंडखोर ठाकरे गटात
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करीत भाजपविरोधातच निवडणूक लढविणाऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची महापालिका निवडणुकीत तिकिटे कापण्यात आली. या बंडखोरांनी आता शिवसेना (उबाठा) पक्षाकडून उमेदवारी घेत अनेक प्रभागात भाजपच्या उमेदवारांविरुद्ध दंड थोपटले आहेत. यात पिंप्राळ्यातील मयूर कापसे आणि धीरज सोनवणे यांनी उद्धव ठाकरे गटाची मशाल हातात घेतली आहे.
बाहरेच्या शेठजीच्या हातात मुंबई द्यायची हा महायुतीचा डाव; ठाकरेंचे शिवसैनिक संतापले!
विधानसभा निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश भोळे यांच्याविरोधात मयूर कापसे आणि माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी बंडखोरी केली होती. डॉ. अश्विन सोनवणे यांच्यासोबत काम केल्याचा ठपका माजी नगरसेवक धीरज सोनवणे यांनाही पक्षाने गेल्या काही काळापासून दूरच ठेवले होते. निवडणूक निकालानंतर या बंडखोरांनी पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, भोळे यांच्या विरोधामुळे या नेत्यांंना पुन्हा पक्षात घेण्यात आले नाही.
