• Sat. Mar 14th, 2026

    BMC Elections: मुंबईत अखेरच्या क्षणापर्यंत आघाडीत पेच, शहरातील 16 प्रभाग उमेदवाराविना; पाहा कोणते

    BMC Elections: मुंबईत अखेरच्या क्षणापर्यंत आघाडीत पेच, शहरातील 16 प्रभाग उमेदवाराविना; पाहा कोणते

    Mumbai Elections: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अर्जाच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस–वंचित आघाडीत गोंधळ उडाला. वंचितकडून परत आलेल्या 21 पैकी 16 जागांवर काँग्रेसला उमेदवार देता न आल्याने पक्षात तीव्र नाराजी पसरली असून, या जागांवर पुढील निर्णय काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सौरभ शर्मा, मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अखेरच्या क्षणी काँग्रेसने ‘वंचित’सोबत आघाडी करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली. काँग्रेसने ‘वंचित’ला मुंबईत ६२ जागा दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, मिळालेल्या ६२ पैकी तब्बल २१ जागा काँग्रेसकडे परत केल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. या २१ जागांपैकी ५ जागेवर अखेरच्या क्षणी काँग्रेसने उमेदवार दिले असून १६ जागांवर उमेदवार मिळालेला नाही. जागांसंदर्भात अखेरच्या क्षणांपर्यंत या गोंधळामुळे काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

    मुंबई काँग्रेसकडून वंचितला थेट ६२ जागा देण्यात आल्या. पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी असताना काँग्रेसने ६२ जागा वंचितला आणि काही जागा महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला दिल्याने काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. नाराजीनाट्याला शमविण्यासाठी काँग्रेसच्या नेते मंडळींची प्रयत्नांची पराकष्ठा सुरू असतानाच मंगळवारी निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी नवा वाद सुरू झाला.

    Maharashtra TimesBMC Election : धाकधूक.. उत्कंठा.. अन् दुपारी अडीचला AB फॉर्म हाती, राज ठाकरेंच्या’शिवतीर्था’बाहेर काय-काय घडलं?
    काँग्रेसने ‘वंचित’ला सोडलेल्या ६, ११, १२, १३, १४, १५, २१, ३०, ४६, ७३, ८०, ८४, ८५, १०८, ११७, १५३, १७७, १८२, १९५, १९८, २०७ या प्रभागांतील जागा परत करण्यात आल्या होत्या. त्यातील १६ जागांवर आघाडीचा अधिकृत उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला नसल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. दरम्यान, मंगळवारी ‘वंचित’ने या १६ जागा काँग्रेस पक्षश्रेष्ठींना परत केल्या होत्या, असा दावा वंचितच्या ज्येष्ठ नेत्याने केला. नाराजी, योग्य उमेदवार नसल्याने या जागा परत केल्याचेही सांगण्यात आले.

    मातोश्रीवरून निराशा, उमेदवारी नाकारली; रडत-रडत ठाकरेंच्या रणरागिणीने सगळं सांगितलं

    निर्णय काय ?

    अधिकृत उमेदवार देण्यात मित्रपक्ष असमर्थ ठरल्याने काँग्रेसमध्ये कमालाची नाराजी पसरली आहे. इच्छुक आणि प्रभावी उमेदवार नसतानाही त्यांनी मतदारसंघ घेतले. त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे. उमेदवार नव्हते, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधणे गरजेचे होते, असे मत काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. आता या १६ जागांबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा