Raigad Mother Killed Daughter: एका महिलेने आपल्याच सहा वर्षांच्या मुलीची हत्या केली आहे. तिला मुलगी नको होती, मुलगा हवा होता. त्याबाबत तिने आपल्या पतीकडेही तक्रार केली होती. मात्र, ती असं काही करेल याचा कोणी विचारही केला नसेल.
सुप्रिया प्रमोद म्हामुणकर (वय 30) असे आरोपी महिलेचे नाव असून तिला मुलगा हवा होता. मुलीला जन्म झाल्यापासूनच सुप्रियाने तिचा तिरस्कार सुरू केला होता. पोलीस तपासात असे समोर आले की, सुप्रियाला मुलगी ‘अशी नको’ वाटत होती, ती व्यवस्थित बोलत नव्हती आणि हिंदी भाषेत बोलत असल्यामुळे त्रास होत होता. अनेकदा तिने पतीकडे ‘मला अशी मुलगी नको, ती नीट बोलत नाही’ असे सांगितले होते, असे तपासात समोर आले आहे.
हिमांशीची बॉडी घरात, शिवांकला गोळ्या घालून संपवलं; कॅनडात दोन भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूचं गूढ काय?
सुप्रियाचा पती मुलीबद्दल तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर 23 डिसेंबरच्या रात्री सुप्रियाने मुलीला संपविण्याचा निश्चय केला. त्याच दिवशी मुलीला भेटण्यासाठी तिची आजी भेटवस्तू घेऊन घरात आली होती; मात्र मुलीची आणि आजीची भेट होऊ शकली नाही.
सकाळी, पती घरी परतल्यानंतर झोपलेली मुलगी उठत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने तातडीने रुग्णालयात धाव घेतली. सुरुवातीला रुग्णालयाने हृदयविकाराचा झटका आलेला असल्याचे बनाव केले, परंतु कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना संशय वाटल्याने त्यांनी विशेष शवविच्छेदन करण्याची विनंती केली.
पोस्टमार्टम अहवालात श्वसनमार्ग अडथळ्याचे संकेत मिळाल्यामुळे आई-वडिलांची कसून चौकशी करण्यात आली. सुमारे सहा तासांच्या चौकशीनंतर सुप्रियाने मुलीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी सुप्रियाला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
Crime News: घरामागे अडवलं, पिस्तुल काढली अन्… एकतर्फी प्रेमाने घेतला लेकीचा बळी, ऐकताच आई…
प्राथमिक चौकशीत असेही समोर आले की, सुप्रियावर मनोविकार तज्ज्ञांकडे उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू ठेवला असून, समाजात बालकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे.
ही घटना केवळ कळंबोलीच नाही, तर संपूर्ण समाजासाठी धक्कादायक आहे. बालकांचा जीव घेण्याची ही क्रूर घटना माणुसकीला आव्हान देणारी असून, पालक आणि समाजाने बालकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.
