Yavatmal Postal Scam: एका पोस्टमनच्या घरातून वाटप न करण्यात आलेल्या टपालांची तीन पोती जप्त करण्यात आली आहेत.
मागील वर्षभरापासून काही महत्वाची कागदपत्रे असलेली रजिस्टर, पुस्तकांचे टपाल मिळत नसल्याचे लक्षात आले. याविषयी पांढरकवडा येथील ज्येष्ठ विधीज्ञ गाझी इबादुल्ला खान यांनी पोस्टमास्तरकडे २२ डिसेंबरला तक्रार दाखल केली. सुरुवातीला पोस्टमास्तर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तक्रारकर्ते ॲड. खान यांच्याबरोबर पोस्टमन सतीश धुर्वे यांच्या घरी पाठविले. कर्मचाऱ्यांनी झडती घेतली असता वाटप न केलेल्या टपालांची तीन पोती दडवून ठेवल्याची आढळून आली.
Nashik Crime: दुकानदाराच्या तक्रारीमुळे हताश, नाशकात 29 वर्षीय तरुणाने संपवलं आयुष्य; रात्रभर बेपत्ता अन्…
कर्मचाऱ्यांनी पोती उघडून पाहिली असता त्यांना अनेकांचे आधारकार्ड, एटीएम कार्ड, वाहनपरवाना, नोकरीचे कॉल, जीवन विमा पॉलिसीसह महत्वाच्या नोटीस आढळून आल्या. हे सर्व घेऊन कर्मचारी टपाल कार्यालयात आले. या प्रकरणाची मुख्य डाकघर अधीक्षक मोहन निकम (यवतमाळ) यांनी वणी येथील उपविभागीय पोस्टमास्तर अशोक मुंडे यांच्यावर चौकशीची जबाबदारी सोपविली आहे. चौकशीचा अहवालही अधीक्षकांना देण्यात आला आहे.
Nashik Crime: क्रूरतेची हद्द! त्र्यंबकमध्ये सापडली अनोळखी महिलेची बॉडी, अंगावर अक्षरश:.., घटनेनं खळबळ
नव्या तक्रारीने खळबळ
हे सारे घडत असतानाच पांढरकवडा येथे एचडीएफसी बँकेतील मनीष प्रधान यांनी तक्रार दाखल केली. ७ ऑक्टोबर रोजी नागपूर येथील एचडीएफसी बँकेतील अभिजित मालोकार यांच्याकडे मौल्यवान वस्तू असलेले पार्सल स्पीड पोस्टने पाठवले. त्याची पावती त्यांनी घेतली. नियमाप्रमाणे ८ ऑक्टोबर रोजी पार्सल मिळणे अपेक्षित होते. पण, ते मिळालेच नाही. शेवटी त्यांनी २४ ऑक्टोबर रोजी पांढरकवडाच्या पोस्टमास्तरकडे तक्रार दाखल केली. अडीच महिने होऊनही पार्सल नागपूरला पोहचले नाही. त्यांच्या तक्रारीचे काय झाले हेदेखील पोस्टमास्तरने कळविले नसल्याचे प्रधान यांनी सांगितले.
