• Sun. Mar 8th, 2026

    Sangli Crime: थंडीत शेकोटी घेत बनले दोन जिगरी दोस्त; पण त्या रात्री तरूणासोबत घडलं भयंकर, नशेत… सांगली पोलिसांचा उलगडा

    Sangli Crime: थंडीत शेकोटी घेत बनले दोन जिगरी दोस्त; पण त्या रात्री तरूणासोबत घडलं भयंकर, नशेत… सांगली पोलिसांचा उलगडा

    Sangli Man Murder: सांगली जिल्ह्यात 18 डिसेंबर रोजी एका तरूणाची हत्या करण्यात आली होती. त्याचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला असून, आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना आरोपींनी त्या रात्री नेमकं काय घडलं याची कबुलीसुद्धा दिली आहे.

    स्वप्निल एरंडोलीकर, सांगली: सांगली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका तरूणाची हत्या झाली होती. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्या खूनाचा उलगडा पोलिसांनी लावला असून, स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत गुन्हेगारांची या प्रकरणात अटक केली आहे. शिवाय पोलिसांच्या तपासात या हत्येमागील भयंकर कारण सुद्धा समोर आले आहे.

    सांगलीतील जत येथे 18 डिसेंबर रोजी विकास टकले यांची हत्या झाली होती. तेव्हापासून, आरोपी फरार होते आणि पोलिस त्यांचा तपास करत होते. तपासात दारू न दिल्याच्या रागातूनच दोघांनी त्याचा खून केल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी रवींद्र आबासाहेब बंडगर आणि विराज संजय पांढरे या दोघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

    Maharashtra TimesPune Crime : अरे संदेश, हे कसं जमेल मला? पुण्यात विवाहित प्रेयसीकडे प्रियकराची भलतीच मागणी, नकार देताच थेट…

    काय घडलं त्या रात्री?

    मयत विकास टकले आणि अटक करण्यात आलेले दोघे संशयित रवींद्र बंडगर आणि विराज पांढरे हे या घटनेआधी एकमेकांना ओळखत नव्हते. त्या रात्री दोघे मारेकरी दारूच्या नशेत जत येथे शेकोटी करून शेकत बसले होते. त्यावेळी विकास टकले हे सुद्धा मद्यधूंद अवस्थेत त्या दोघांजवळ पोहचले. शेकोटी शेजारी जाऊन बसले.

    त्यावेळी त्या तिघांची ओळख झाली. नंतर, विकासने त्यांच्याकडून दारू मागितली. दोघांनीही विकासला, “आमच्याकडे पैसे नाहीत तू दारू दे” असे सांगितले. हे मागणं विकासने मान्य केलं आणि त्या दोघांसोबत तो दारूच्या दुकानासमोर गेला. दुकानावर जाताच विकास ने, “माझ्या कडेही पैसे नाहीत असे सांगितले.” हे ऐकताच दोन्ही गुन्हेगारांचा राग अनावर झाला आणि त्यांच्या वाद सुरू झाला. विकासने ही त्यांना शिवीगाळ करायला सुरूवात केली. हे ऐकून हा वाद आणखीन टोकाला गेला आणि दोघांनी विकासला दगडाने ठेचायला सुरूवात केली. या मारहाणीत विकासचा जागीच मृत्यू झाला.

    ही वन डे मॅच नाही, २० दिवसाची मॅच आहे तोपर्यंत काही होऊ नये; आष्टीतील राड्यावर जयंतरावांचं भाष्य

    हत्या करताच दोघेही फरार झाले. पोलिसांनी तपास सुरू करताच यांची ओळख पटली आणि ते सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्यांना अटक करून तपासणीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. त्यावेळी त्यांनी विकासला दारू न दिल्याच्या रागातूनच विकास याचा खून केल्याची दोघांनी कबुली दिली. या प्रकरणात सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई सुरू आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा