• Tue. Mar 10th, 2026
    अशा भावना मरताना येण्यापेक्षा जिवंतपणी आलेल्या बऱ्या…. पत्रकारांचा तो प्रश्न, अन् संजय राऊत म्हणाले, शेवटच्या टप्प्यात दोन चमचे पाणी पाजून…

    Sanjay Raut on MNS Shiv Sena UBT alliance : संजय राऊत म्हणाले की “माणसाने बोललं पाहिजे. शेवटच्या टप्प्यात दोन चमचे पाणी पाजून, अरे अरे माझं हे बोलायचं राहिलं, ही राष्ट्रीय समस्या आहे”

    संजय राऊत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : ठाकरे बंधूंची युती झालेली आहे, केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे, असं वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. तर सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टबद्दल प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की उशीर झाला, बोलायचं राहून गेलं, अशा भावना मरताना येण्यापेक्षा जिवंतपणी आलेल्या बऱ्या.

    संजय राऊत यांची पोस्ट

    हिमांशु मोहन यांच्या काही ओळी खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. “एक दिन हम सब अपनी – अपनी चुप्पियों को लेकर मर जाएँगे और हमारा सबसे आख़िरी ख़याल होगा हमें बोलना चाहिए था।” अशा ओळी शेअर करताना संजय राऊत यांनी ‘हमें बोलना चाहिये था…..!’ असं कॅप्शन दिलं होतं. पत्रकारांनी याविषयी विचारलं असता, संजय राऊत म्हणाले की “माणसाने बोललं पाहिजे. शेवटच्या टप्प्यात दोन चमचे पाणी पाजून, अरे अरे माझं हे बोलायचं राहिलं, ही राष्ट्रीय समस्या आहे”

    संजय राऊत काय म्हणाले?

    “ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे आणि बिहारचे निकाल लावण्यात आले. ज्या पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्यात आला, ज्या पद्धतीने निवडणूक आयोग ते सुप्रीम कोर्ट सर्व संविधानिक संस्था या भारतीय जनता पक्षासारख्या नेत्यांच्या पायाखाली चिरडल्या जात आहेत,
    त्याबद्दल आता बोललो नाही, तर नंतर उशीर झाला, बोलायचं राहून गेलं, अशा भावना मरताना येण्यापेक्षा जिवंतपणी आलेल्या बऱ्या.” असं संजय राऊत म्हणाले
    Maharashtra TimesPune News : मोठी बातमी! प्रशांत जगताप यांचा शरद पवारांना रामराम, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध भोवला?
    “आमच्यासारखे लोक जिवंतपणी लढत आहेत, कारण आम्ही मुडदे नाही. जिवंत माणसं पाच वर्ष वाट पाहत नाही, हा जिवंत माणसांचा देश आहे. महाराष्ट्र हे जिवंत माणसांचं राज्य आहे” असंही संजय राऊत पुढे म्हणाले.

    २५ वर्ष शिवसेनेने काही केलं नाही तर भाजप आमच्यासोबत खुर्च्या गरम करत का बसली? आदित्य ठाकरेंचा चिमटा

    दरम्यान, उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येणं निश्चित आहे. फक्त जागावाटप आणि औपचारिक घोषणा बाकी आहे, ती आज करायची की उद्या, एवढाच प्रश्न आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा