Jalgaon Gulabrao Patil Election : जळगाव नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांचा गड ढासळला आहे.
जळगाव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी चांगली कामगिरी केली आहे. पाचोरा आणि भडगावचे आमदार किशोर पाटील यांनी दोन्ही नगर परिषदांवर भगवा फडकवला. चोपडा येथील आमदार चंद्रकांत पाटील यांनीही त्यांच्या नगर परिषदेत शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आणला. पारोळाचे आमदार अमोल पाटील यांनीही पारोळा नगर परिषदेत विजय मिळवला.
इतकेच नाही, तर अमळनेरमध्ये नुकतेच शिवसेना शिंदे गटात सामील झालेले माजी आमदार चौधरी यांनीही प्रस्थापितांना धक्का देत विजय मिळवला. मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांनाही मागे टाकत विजय मिळवला. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्या धरणगाव नगर परिषदेत विजय मिळवता आला नाही.
Nanded News : प्रचाराला पक्षश्रेष्ठींनी पाठ फिरवली, पण जनतेने तारलं; नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिलेदाराचा मोठ्या मताधिक्याने विजय
धरणगाव नगर परिषदेची निवडणूक गुलाबराव पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई होती. हा त्यांचा बालेकिल्ला मानला जात होता. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून वैशाली भावे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर शिवसेना ठाकरे (शहर विकास आघाडी) कडून लिलाबाई चौधरी मैदानात होत्या. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. एकीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, तर दुसरीकडे शहर विकास आघाडीने गुलाबराव पाटलांच्या गडाला हादरा देण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती.
Uday Samant : ‘मलिक असतील, तर राष्ट्रवादी नको’, मुंबईसाठी उदय सामंतांची रोखठोक भूमिका
गुलाबराव पाटील यांनी धरणगावमध्ये अनेक सभा घेतल्या आणि विरोधकांवर टीका केली. मात्र, त्यांचा करिष्मा या निवडणुकीत चालला नाही. दुसरीकडे, लिलाबाई चौधरी यांनी त्यांच्या अहिराणी भाषेतून एक जोरदार सभा घेतली. या सभेत त्यांनी गुलाबराव पाटलांवर टीका करताना म्हटले की, “गुलाबराव पाटलांना घातलेले कपडे हे माझ्या नवऱ्याने शोधून दिले होते.” या वक्तव्याने त्यांनी गुलाबराव पाटलांना चांगलेच घेरले. विरोधकांनीही या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती.
धरणगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनेही लिलाबाई चौधरी यांच्यासाठी काम केल्याची चर्चा आहे. लिलाबाई चौधरी या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या. जर धरणगाव शहराचा विकास करायचा असेल, तर लिलाबाई चौधरी भाजपमध्ये जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत, जिल्ह्यातील इतर शिवसेना आमदारांनी आपले गड जिंकले असले तरी, गुलाबराव पाटलांचा गड मात्र ढासळला.
मुलगा आधुनिक शेतकरी असेल तर पहिली चॉईस त्याला द्या; बदलत्या लग्नसंस्थेवर गुलाबराव पाटील यांचे मत
या नगर परिषदेच्या निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री अनिल पाटील यांसारख्या प्रस्थापितांना मोठा धक्का बसला आहे. या पराभवांमुळे त्यांना आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
