• Mon. Jun 15th, 2026
    Railway Fare Hike: लांब पल्ल्याचा प्रवास महागणार; 26 डिसेंबरपासून तिकीट दरांत होणार वाढ, जाणून घ्या नवे दर

    Railway Fare Hike News: सणासुदीच्या काळात १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवण्यात आल्या, हे कार्यक्षमतेचे उदाहरण असल्याचेही रेल्वेने नमूद केले आहे.

    railway ticket hike(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: भारतीय रेल्वेने वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी तिकीट दरांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २६ डिसेंबर २०२५ रोजी रेल्वेची नवीन तिकीट रचना लागू होणार आहे. यामध्ये उपनगरीय प्रवाशांना दिलासा देण्यात आला असला, तरी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तिकीट महाग होणार आहे. रेल्वेचा वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी तिकीट दराची पुनर्रचना करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

    रेल्वेचा प्रवास स्वस्त व सुरक्षित समजला जातो. त्यामुळे दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने गेल्या दशकात आपले जाळे आणि ऑपरेशन मोठ्या प्रमाणावर वाढवले असून, सुरक्षितता सुधारण्यासाठी, सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी मनुष्यबळात वाढ केली आहे. मनुष्यबळावरील खर्च एक लाख १५ हजार कोटी रुपये, तर निवृत्तिवेतनावरील खर्च ६० हजार कोटी रुपये इतका झाला आहे. सन २०२४-२५मध्ये रेल्वेचा ऑपरेशनल खर्च दोन लाख ६३ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या वाढत्या खर्चाचा समतोल साधण्यासाठी रेल्वे अधिक मालवाहतुकीवर भर देत असून, प्रवासी तिकीट दरात अत्यल्प वाढ करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

    Maharashtra TimesAjit Pawar: आम्हीही गप्प बसणार नाही; पक्षप्रवेशावरुन अजित पवारांचे भाजपला आव्हान, दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीचे स्पष्ट संकेत
    येत्या २६ डिसेंबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे. उपनगरीय रेल्वे आणि मासिक सीझन तिकिटांमध्ये कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता यांसारख्या शहरांतील रोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. नवीन दररचनेमुळे रेल्वेला वर्षाला ६०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. या उपाययोजनांमुळे सुरक्षिततेत मोठी सुधारणा झाली असून, भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मालवाहतूक करणारी रेल्वे व्यवस्था ठरली आहे.

    ‘ही तिकीट दरवाढ प्रवाशांच्या खिशाला झळ पोहोचवणारी आहे. किमान सामान्य वर्गासाठी दरवाढ करू नये,’ अशी मागणी विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य आनंद सप्तर्षी यांनी केली आहे.
    Maharashtra TimesJejuri Accident: जेजुरीत भीषण दुर्घटना; खंडोबाच्या पायरीवर भंडाऱ्याचा भडका, नव्या नगरसेविकांसह 16 जण गंभीर
    असे असतील नवीन दर
    रेल्वे प्रशासनाकडून २१५ किलोमीटरपर्यंतच्या सामान्य वर्गाच्या प्रवासासाठीही तिकीट दर वाढवण्यात आलेले नाहीत. मात्र, २१५ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी सामान्य वर्गाच्या तिकिटांमध्ये प्रति किलोमीटर एक पैशाची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय मेल/एक्स्प्रेस नॉन-एसी गाड्यांसाठी प्रति किलोमीटर दोन पैसे, तर एसी वर्गासाठीही प्रति किलोमीटर दोन पैशांची वाढ लागू होणार आहे. म्हणजेच, नॉन-एसी कोचमधून ५०० किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशाला दहा रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा