भाजपच्या खालोखाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५३ नगराध्यक्षांच्या जागांवर तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ३७ नगराध्यक्षपदांच्या जागांवर विजय मिळविला. त्यामुळे २८८ पैकी महायुतीने एकत्रित २०० पेक्षा जास्त जागांवर यश मिळविला आहे. महाविकास आघाडीला नगराध्यक्षांच्या संख्येत एकत्रितरित्या अर्धशतकही ओलांडता आले नाही. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तिन्ही पक्षांसाठी हे निकाल हुरूप वाढविणारे ठरणार आहेत.
Eknath Shinde: नगर परिषद निवडणुकीत भाजप पाठोपाठ शिंदेंची शिवसेना अव्वल, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, खरी शिवसेना…
ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, बदलापूर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपने आपला झेंडा रोवत शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. अंबरनाथमध्ये भाजपचे १४ तर बदलापूर नगर परिषदेत २२ नगरसेवक निवडून आले. दोन्ही पालिकांत नगरसेवकांचे संख्याबळ अधिक राखण्यात शिवसेनेला यश आले असले तरी अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला. वाडा, पालघर, डहाणू आणि जव्हार येथील निवडणुकीत डहाणू आणि पालघरमध्ये शिवसेनेची सरशी झाली. तर जव्हार आणि वाडामध्ये भाजपला विजय मिळाला. कोकणात महायुतीची सरशी झाली.
राज्यातील चित्र
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजपने उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथील बहुतांश ठिकाणी विजय मिळवत पहिला क्रमांक पटकावला. कोकणात शिवसेना मोठा भाऊ ठरली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात चांगली कामगिरी नोंदविल्याचे चित्र आहे.
Uday Samant : ‘मलिक असतील, तर राष्ट्रवादी नको’, मुंबईसाठी उदय सामंतांची रोखठोक भूमिका
२८८ एकूण
१२९ भाजप
५१ शिवसेना
३३ राष्ट्रवादी काँग्रेस
३५ काँग्रेस
पक्षनिहाय जिंकलेल्या नगर परिषदा/पंचायती
०८ राष्ट्रवादी (शप)
०८ शिवसेना उबाठा पक्ष
२४ इतर
(जिंकलेल्या नगराध्यक्षपदांची संख्या आणि नगर परिषदा/पंचायतोंची संख्या वेगळी आहे.)
Nagpur Elections Results: महायुतीला ऐतिहासिक विजय, भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष, नागपुरात 35 वर्षांनी पहिल्यांदाच हे घडलं
निवडणुकीत भाजप हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. गेल्या २५ वर्षांत कोणाला मिळाला नसेल असा हा विजय आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनीही चांगली कामगिरी केली. मतदारांचे मनःपूर्वक आभार. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आमच्यावर नकली असल्याची टीका करणाऱ्यांना असली कोण आहे, हे जनतेने दाखवून दिले. महापालिका निवडणुकीतही याचीच चारीमुंड्या चीत करू. पुनरावृत्ती होईल. विरोधकांना – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सत्ताधाऱ्यांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळेच झाला आहे. सत्ताधारी पक्षाकडून साम, दाम, दंड, भेद या नीतीचा मुक्तपणे वापर करण्यात आला. – हर्षवर्धन सपकाळ, काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष
