• Thu. Mar 12th, 2026
    पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नगरपरिषदेवर भाजपचा विजय

    Solapur Local Body Election Results: सोलापूर जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बार्शी नगरपरिषदेवर भाजपचा निर्विवाद विजय झाला आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विद्यमान आमदार दिलीप सोपलात खरी लढत होती. माजी आमदाराने विद्यमान आमदाराच्या गटाला पराभूत केलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील नगरपरिषदेवर भाजपने निर्विवाद विजय संपादन केले आहे. नगराध्यक्ष पदी भाजपच्या तेजस्विनी कथले या 4 हजार 638 मतांनी विजयी झाल्या आहेत. माजी आमदार व भाजप नेते राजेंद्र राऊत यांचा पाठिंब्यामुळे विजयी झालो, अशी प्रतिक्रिया विजयी नगराध्यक्ष तेजस्वीनी कथले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बार्शी नगरपरिषदेला ओळखले जाते.

    बार्शी नगरपरिषदेवर वर एकूण 42 नगरसेवकांसाठी आणि एक नगराध्यक्षपदासाठी निवडणूक संपन्न झाली. निवडणूक निकालानंतर भाजप उमेदवार 23 जागा विजयी झाले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार दिलीप सोपल गटाने 19 जागा विजय संपादन केला आहे. माजी आमदार आणि भाजप नेते राजेंद्र राऊत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास व्यक्ती म्हणून ओळखले जाते. आगामी काही दिवसांत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. या निवडणुकीत तर विरोधकांनी नादच करायचं नाही असा इशारा भाजप नेत्याने दिला आहे.
    Maharashtra TimesRaigad Elections: उमेदवार 21, पण विजय फक्त 1; अलिबागमध्ये भाजप–शिंदे युतीची रणनीती अपयशी, चूक कुठे झाली?

    जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत नादच करायचं नाय

    बार्शी नगरपरिषदेच्या विजयानंतर भाजप नेते व माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. आता काही दिवसांत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. राजेंद्र राऊत यांनी बोलताना आत्मविश्वास दाखवला, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी विरोधकांनी नादच करायच नाही असा इशारा दिला आहे.

    फडणवीसांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; फडणवीसांनी अभिनंदन केलं

    बार्शी नगरपरिषदेवर भाजप नेते आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी भाजपची सत्ता खेचून आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.42 पैकी 23 नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत.नगराध्यक्षपदी भाजपच्या तेजस्विनी कथले यांचा 4 हजार मतांनी विजय झाला आहे.याच अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राजेंद्र राऊत यांनी कॉल केला होता.माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी नगरपरिषदेवर विजयाचा झेंडा फडकविला आहे.त्याबाबतच खूप खूप अभिनंदन असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा