• Sat. Mar 7th, 2026
    नवाब मलिकांवरील जबाबदारी, प्रज्ञा सातवांचा भाजप प्रवेश ते कोकाटेंचा राजीनामा, विखेंची उत्तरं!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुबंई पालिका निवडणुकीची जबाबदारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिकांवर सोपावली आहे. दरम्यान मलिक असल्याने युती होणार नसल्याची भूमिका संजय शिरसाठ यांनी मांडली आहे. यावर राधाकृष्ण विखे यांनी शिरसाठ यांना चांगलाचं टोला लागवला आहे. यावेळी काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांनी भाजपात प्रवेश केला आहे यावर बोलताना ते म्हणाले, दुर्दैवाने विरोधकांकडे माणसं थांबायला तयार नाही. त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे आज वोट चोरी पलीकडे समाज आहे, देश आहे. यावेळी बोलताना त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, कोकाटे यांचं हे प्रकरण खूप जुनं आहे त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. मात्र माणिकरावांवर एक प्रकारे अन्याय झाला अशी भावना विखेंनी व्यक्त केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed