• Sat. Mar 7th, 2026
    Raigad News : विरार-अलिबाग कॉरिडॉर; कनेक्टिव्हिटी वाढणार, मोरबे, मुंबई, पुणे एक्सप्रेसवे… कसा असणार मार्ग?

    Virar-Alibag Corridor : विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असून यामुळे कनेक्टिव्हिटी वाढण्यासह वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : मुंबई महानगर प्रदेशाला नवी आर्थिक गती देणारा विरार – अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर प्रकल्प आता चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. हा कॉरिडॉर जेएनपीटी, नवी मुंबई विमानतळ, एमटीएचएल आणि डीएफसी यांना जलद कनेक्टिव्हिटी देईल. विरार – अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर प्रकल्पामुळे शहरातील माल वाहतूक आणि जड वाहतूक अधिक सुलभ करेल. तसंच ग्रामीण भागाचा महानगराशी कनेक्टिव्हिटीही मजबूत करेल. परंतु, या प्रकल्पामुळे पर्यावरणीय प्रश्नही उभे आहेत.

    कसा असेल विरार – अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरचा मार्ग?

    विरार – अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरचा रस्ते मार्ग नवघर ते दिवे अंजूर, दिवे अंजूर ते काटई नाका, पुढे काटई ते मोरबे, मोरबे ते मुंबई, पुणे एक्सप्रेसवे ते करंजाडे आणि करंजाडे ते अटल सेतू या सहा विभागांमध्ये इंटरचेंजसह तयार केला जाणार आहे. हा मार्ग केवळ वाहतूकच जलद करणार नाही, तर नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणार आहेत. त्यामुळे या कॉरिडॉरमुळे अनेकदृष्टीने फायदा होणार आहे. मात्र पर्यावरणीयदृष्ट्या अनेक बाबी उपस्थित होत आहेत.
    Maharashtra TimesNavi Mumbai News : अत्याधुनिक डिझाइन, 100 कोटी खर्च…नवी मुंबईत नवं रेल्वे स्थानक, प्रवाशांची मोठी सुविधा, कसं-कुठे आहे स्टेशन?
    मंग्रोव्ह सेलच्या अहवालानुसार, विरार – अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर प्रकल्पामुळे 5043 खारफुटी 75 हेक्टर क्षेत्रावर बाधित होणार आहेत. तर रस्ते विकास महामंडळाच्या ईआयए अहवालात फक्त 59.23 हेक्टर क्षेत्र दाखवलं गेलं असून, खारफुटींची संख्या नाही. ही विसंगती सीआरझेड प्राधिकरणाला लक्षात आली असून, त्यांनी सुधारित प्रस्तावात कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या बाधित झाडांची संख्या आणि भरपाईच्या उपाययोजनांची स्पष्ट माहिती सादर करण्यास सांगितलं आहे.

    पुणे-नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेप्रकरणी शिंदेंचे आमदार आक्रमक; अमोल खताळ यांची विधानभवनात निदर्शने

    तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, विकास आणि पर्यावरणीय संवेदनशीलता यामध्ये संतुलन साधणं हे या प्रकल्पाचे सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे. योग्य नियोजन, खारफुटींची भरपाई, पुनर्वनरोपण आणि देखभाल या उपाययोजना केल्या गेल्या तर हा प्रकल्प फक्त मुंबई महानगर प्रदेशासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या लाभदायी ठरू शकतो.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा